वरळीत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या ४२व्या मजल्यावरून दगड कोसळल्याने दोन पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू; वाहनांचाही चुराडा

मुंबई : मुंबईत वरळी येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या ४२व्या मजल्यावरून दगड कोसळल्याने दोन पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. साबीर अली (३६) आणि इम्रान अली खान (३०) अशी मृतांची नावे आहेत.


येथे यापूर्वीही इमारतीवरून बांधकामाचे दगड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, साबीर अली आणि इम्रान अली खान हे मंगळवारी रात्री या इमारतीखालून जात होते. यावेळी बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीवरून भला मोठ्ठा दगड खाली पडला. हा दगड ४२व्या मजल्यावरून पडल्याचे समजते. या दगडाखाली साबीर अली आणि इम्रान अली सापडले. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.


वरळीमध्ये यापूर्वीही बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून दगड कोसळ्याच्या घटना घडल्या होत्या. त्यात ९ जानेवारी रोजी दगडाखाली सापडून दोघांचा मृत्यू झाला होता. मात्र, असे अपघात होऊनही बांधकाम करताना योग्य ती दक्षता घेतली जात नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे.


मुंबईत योग्य ती खबरदारी न घेता बांधकाम होत असेल आणि त्यात नागरिकांचा जीव जात असेल, तर ही अतिशय भयंकर घटना आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. गगनचुंबी इमारतीचे बांधकाम करताना योग्य ती काळजी घेतली जावी. अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना