वरळीत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या ४२व्या मजल्यावरून दगड कोसळल्याने दोन पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू; वाहनांचाही चुराडा

  141

मुंबई : मुंबईत वरळी येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या ४२व्या मजल्यावरून दगड कोसळल्याने दोन पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. साबीर अली (३६) आणि इम्रान अली खान (३०) अशी मृतांची नावे आहेत.


येथे यापूर्वीही इमारतीवरून बांधकामाचे दगड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, साबीर अली आणि इम्रान अली खान हे मंगळवारी रात्री या इमारतीखालून जात होते. यावेळी बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीवरून भला मोठ्ठा दगड खाली पडला. हा दगड ४२व्या मजल्यावरून पडल्याचे समजते. या दगडाखाली साबीर अली आणि इम्रान अली सापडले. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.


वरळीमध्ये यापूर्वीही बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून दगड कोसळ्याच्या घटना घडल्या होत्या. त्यात ९ जानेवारी रोजी दगडाखाली सापडून दोघांचा मृत्यू झाला होता. मात्र, असे अपघात होऊनही बांधकाम करताना योग्य ती दक्षता घेतली जात नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे.


मुंबईत योग्य ती खबरदारी न घेता बांधकाम होत असेल आणि त्यात नागरिकांचा जीव जात असेल, तर ही अतिशय भयंकर घटना आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. गगनचुंबी इमारतीचे बांधकाम करताना योग्य ती काळजी घेतली जावी. अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Comments
Add Comment

पेंग्विनच्या देखभालीवर २५ कोटी खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहायलातील (राणीची बाग)

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्याचा मार्ग मोकळा

मुंबई: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा

मातोश्रीकडे डुप्लिकेट शिवसेना

मुंबई : खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यांनी अडीच

राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान - एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून, संबंधित

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - अजित पवार

मुंबई : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांचेच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी

शासकीय कार्यालयात 'बर्थडे केक' कापणाऱ्यावर होणार कारवाई

मुंबई : शासकीय कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी, फोटोसेशन करणे महागात