वरळीत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या ४२व्या मजल्यावरून दगड कोसळल्याने दोन पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू; वाहनांचाही चुराडा

  140

मुंबई : मुंबईत वरळी येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या ४२व्या मजल्यावरून दगड कोसळल्याने दोन पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. साबीर अली (३६) आणि इम्रान अली खान (३०) अशी मृतांची नावे आहेत.


येथे यापूर्वीही इमारतीवरून बांधकामाचे दगड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, साबीर अली आणि इम्रान अली खान हे मंगळवारी रात्री या इमारतीखालून जात होते. यावेळी बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीवरून भला मोठ्ठा दगड खाली पडला. हा दगड ४२व्या मजल्यावरून पडल्याचे समजते. या दगडाखाली साबीर अली आणि इम्रान अली सापडले. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.


वरळीमध्ये यापूर्वीही बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून दगड कोसळ्याच्या घटना घडल्या होत्या. त्यात ९ जानेवारी रोजी दगडाखाली सापडून दोघांचा मृत्यू झाला होता. मात्र, असे अपघात होऊनही बांधकाम करताना योग्य ती दक्षता घेतली जात नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे.


मुंबईत योग्य ती खबरदारी न घेता बांधकाम होत असेल आणि त्यात नागरिकांचा जीव जात असेल, तर ही अतिशय भयंकर घटना आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. गगनचुंबी इमारतीचे बांधकाम करताना योग्य ती काळजी घेतली जावी. अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Comments
Add Comment

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन