भाजपाच्या रोजगार मेळाव्यातून बेरोजगारांना रोजगार

कल्याण : भारतीय जनता पार्टीचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि नगरसेविका कविता म्हात्रे यांच्यावतीने डोंबिवलीतील मॉंडल इंग्लिश स्कूल कुंभारखाण पाडा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात ६० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला होता. याद्वारे मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.


कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. आता कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर सर्व जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मात्र बेरोजगार झालेल्या अनेकांना आपल्या नोकरीचा प्रश्न भेडसावत होता. अशा बेरोजगारांसाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती आयोजक विकास म्हात्रे यांनी दिली.



यावेळी फार्मास्युटिकल, हेल्थकेअर, पेट्रोकेमिकल, केमिकल, बँक, आयटी, मॅन्युफॅक्चरिंग, कन्सल्टंट, हाउसकीपिंग, सिक्युरिटी, कॉर्पोरेट इत्यादी विविध क्षेत्रातील ६० कंपन्या आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे शिक्षण, कला आणि अनुभवाच्या आधारे त्यांना नोकरी दिली. मुलाखती घेतल्यानंतर जागेवरच नियुक्ती लेटर देण्यात आले, त्यामुळे डोंबिवलीतील शेकडो सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली.

Comments
Add Comment

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी

कफ परेड येथील चाळीत भीषण आग; एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जण जखमी

मुंबई: मुंबईतील कफ परेड परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा

नरकचतुर्दशी : अभ्यंगस्नान आणि नरकासुराचा वध!

मुंबई : आज सर्वत्र दिवाळीच्या उत्साहात नरकचतुर्दशी साजरी होत आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी

दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धीसह सौहार्द घेऊन येवो - उपमुख्यमंत्री पवार

मुंबई : दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा, नव्या संधी आणि