माजी मुख्यमंत्र्यांसाठी महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर

  71

भाईंदर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका खाजगी कार्यक्रमासाठी मीरा-भाईंदर शहरात सकाळी येणार असल्याने महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवत त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यानी शहारातील सर्व विजेचे खांब आणि अनेक झाडावर त्यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत.


भाईंदर पश्चिम भागातील जिर्णोद्धार झालेल्या जैन मंदिराच्या कार्यक्रमाला तसेच जैन मुनी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरूवारी सकाळी ११ वाजता शहरात येणार होते. त्यानिमित्ताने दहिसर चेक नाका ते भाईंदर पश्चिम भागातील कार्यक्रम स्थळापर्यंतच्या सर्व विजेचे खांब आणि अनेक झाडावर त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. महापालिकेच्या नियमा नुसार विजेचे खांब आणि झाडावर फलक लावण्यास परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे सर्व फलक अनधिकृत आहेत. दुपारी १ वाजे पर्यंत उद्धव ठाकरे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले नव्हते.


दरम्यान याबाबत, महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी जितेंद्र कांबळे यांनी प्रतिक्रिया देताना, शहारत फलक लावण्यास बंदी आहे. विजेचे खांब आणि झाडावर लावण्यात आलेले सर्व फलक अनधिकृत आहेत त्यावर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

वट पौर्णिमा २०२५ : वडाच्या साक्षीने अखंड सौभाग्यासाठीचा व्रत जाणून घ्या सर्व माहिती

मुंबई - भारतीय संस्कृतीत विवाहित महिलांसाठी अनेक व्रतवैकल्यांची परंपरा आहे, परंतु काही व्रतं अशी असतात जी

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

एलॉन मस्क यांच्यावरून ट्रम्प - पुतिन यांच्यात जुंपणार?

रशियाने देऊ केला राजकीय आश्रय वॉशिग्टन: टेस्ला कंपनीचे सीईओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.