माजी मुख्यमंत्र्यांसाठी महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर

  76

भाईंदर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका खाजगी कार्यक्रमासाठी मीरा-भाईंदर शहरात सकाळी येणार असल्याने महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवत त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यानी शहारातील सर्व विजेचे खांब आणि अनेक झाडावर त्यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत.


भाईंदर पश्चिम भागातील जिर्णोद्धार झालेल्या जैन मंदिराच्या कार्यक्रमाला तसेच जैन मुनी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरूवारी सकाळी ११ वाजता शहरात येणार होते. त्यानिमित्ताने दहिसर चेक नाका ते भाईंदर पश्चिम भागातील कार्यक्रम स्थळापर्यंतच्या सर्व विजेचे खांब आणि अनेक झाडावर त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. महापालिकेच्या नियमा नुसार विजेचे खांब आणि झाडावर फलक लावण्यास परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे सर्व फलक अनधिकृत आहेत. दुपारी १ वाजे पर्यंत उद्धव ठाकरे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले नव्हते.


दरम्यान याबाबत, महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी जितेंद्र कांबळे यांनी प्रतिक्रिया देताना, शहारत फलक लावण्यास बंदी आहे. विजेचे खांब आणि झाडावर लावण्यात आलेले सर्व फलक अनधिकृत आहेत त्यावर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

"बाळाच्या रंगावरून बोलाल तर खबरदार..." टीव्ही अभिनेत्रीने ट्रोलर्सना खडसावले, केली थेट कायदेशीर कारवाई

हिंदी टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या ७ महिन्यांच्या बाळाला सावळ्या रंगामुळे ट्रोल करण्यात

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण