भाईंदर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका खाजगी कार्यक्रमासाठी मीरा-भाईंदर शहरात सकाळी येणार असल्याने महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवत त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यानी शहारातील सर्व विजेचे खांब आणि अनेक झाडावर त्यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत.
भाईंदर पश्चिम भागातील जिर्णोद्धार झालेल्या जैन मंदिराच्या कार्यक्रमाला तसेच जैन मुनी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरूवारी सकाळी ११ वाजता शहरात येणार होते. त्यानिमित्ताने दहिसर चेक नाका ते भाईंदर पश्चिम भागातील कार्यक्रम स्थळापर्यंतच्या सर्व विजेचे खांब आणि अनेक झाडावर त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. महापालिकेच्या नियमा नुसार विजेचे खांब आणि झाडावर फलक लावण्यास परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे सर्व फलक अनधिकृत आहेत. दुपारी १ वाजे पर्यंत उद्धव ठाकरे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले नव्हते.
दरम्यान याबाबत, महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी जितेंद्र कांबळे यांनी प्रतिक्रिया देताना, शहारत फलक लावण्यास बंदी आहे. विजेचे खांब आणि झाडावर लावण्यात आलेले सर्व फलक अनधिकृत आहेत त्यावर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…
मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…