माहुल येथील पम्पिंग स्टेशन ‘परवानग्यांच्या प्रतिक्षेत’

  124

मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळ्यात मुंबई शहर आणि उपनगरातील पाणी साचण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी माहुल येथे पम्पिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. यासाठी माहुल पम्पिंग स्टेशनसाठी मिठागरची ६.१७६ जागा देण्यास केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनने मंजुरीही दिली होती. मात्र केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या परवानग्यांची प्रतिक्षा मुंबई महापालिका प्रशासनाला असल्याने माहुल पम्पिंग स्टेशनचे काम अद्याप पूर्णत्वास येऊ शकले नाही. त्यामुळे गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, चेंबूर येथील सिंधी सोसायटी व कुर्ल्याच्या नेहरू नगर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना यंदाच्या पावसाळ्यातही पाणी तुंबण्याच्या घटनेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.


माहुल येथे पम्पिंग स्टेशनसाठी मिठागरची ६.१७६ जागा देण्यास केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनने हिरवा कंदील दिला आहे. मात्र पम्पिंग स्टेशन उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण व सीआरझेड विभागाची परवानगी मिळण्यास तीन ते चार महिन्यांचा वेळ लागणार आहे. गांधी मार्केट, चेंबूर सिंधी सोसायटी, नेहरू नगर, माटुंगा कुर्ल्यासह सायन रेल्वे स्थानक परिसर दरवर्षी पावसाळ्यात जलमय होतो. यावर उपाय म्हणून माहुल येथे पम्पिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. माहुल पम्पिंग स्टेशनसाठी मिठागरची ६.१७६ जागा देण्यास केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनने मंजुरी दिली. मिठागरच्या जागेच्या मोबदल्यात मुंबई महापालिका केंद्र सरकारला ११८ कोटी रुपये मोजणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रखडलेल्या माहुल पम्पिंग स्टेशनचा मार्ग मोकळा झाला असे वाटत असले, तरी केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या परवानग्यांची प्रतिक्षा मुंबई महापालिका प्रशासनाला आहे. त्यामुळे गांधी मार्केट, कुर्ला नेहरू नगर, माटुंगा कुर्ल्यासह सायन परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना यंदाच्या पावसाळ्यात तरी पाणी साचण्याच्या समस्येपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता