मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघनायक केशरीनाथ पवार यांचे गुरुवारी पहाटे आकस्मित निधन झाले. निधनासमयी ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी किशोरी, दोन मुलगे, सुना व नातू असा परिवार आहे. बुधवारी त्यांना अस्वस्थ वाटल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालविली.
पवार यांनी ना. म. जोशी मार्ग आल्हाद सेवा मंडळ येथून आपल्या कबड्डी खेळाला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक हा त्यांचा पहिला व्यावसायिक संघ होता. काही काळ ते मध्य रेल्वेकडून देखील खेळले. पण महिंद्रामध्ये खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द गाजली. १९७० ते ८० हे दशक त्यांनी गाजविले. त्यांनी ३ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी मुंबई बरोबरच महाराष्ट्राचेही नेतृत्व केले.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…