भारतीय क्रिकेटपटूंचा आता जगातील टॉप सेलिब्रिटींमध्ये समावेश होतो. भारतीय क्रिकेटमधील बहुतेक स्टार्सचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. गेल्या वर्षी तसेच या वर्षी लग्नबंधनात अडकलेल्या क्रिकेटर्सची लव्ह स्टोरी घेऊया जाणून.
युझवेंद्र चहल
आयपीएल २०२० पूर्वी, युझवेंद्र चहलने धनश्री वर्मासोबतच्या त्याचे नाते जाहिर केले. धनश्रीने आपल्या प्रियकराला सरप्राईज करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा प्रवासही केला. भारताच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यानंतर, चहल भारतात परतला आणि २२ डिसेंबर रोजी लग्न केले.
हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्याने १ जानेवारी २०२० रोजी त्याच्या साखरपुड्याच्या बातमीने चाहत्यांना सुखद धक्का दिला. पांड्याने दुबईमध्ये सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविक सोबतच्या एंगेजमेंट व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर लवकरच, हे जोडपे भारतात परतले आणि हार्दिकने क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. लॉकडाऊनच्या काळात हार्दिकने तिच्याशी लग्न केले. या जोडप्यासा अगस्त्य नावाचा मुलगा आहे.
जयदेव उनाडकट
जयदेव उनाडकट हा डावखुरा वेगवान गोलंदाजी करणाऱ्या मोजक्या भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. जयदेव उनाडकटने २ फेब्रुवारी २०२१ रोजी रिनी कांटारियासोबत लग्न केले. त्यांच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.
वरुण चक्रवर्ती
वरुण चक्रवर्ती आयपीएल २०२० नंतर मायदेशी परतला तेव्हा त्याने त्याची जूनी मैत्रीण नेहा खेडेकरशी लग्न केले. चेन्नईमध्ये एका शानदार सोहळ्यात दोघांचे लग्न झाले.
विजय शंकर
विजय शंकर याने २०२० मध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व केले. दुर्दैवाने, स्पर्धेदरम्यान विजयला त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. त्यामुळे २०२१ सालची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीही तो मुकला. शंकरने २०२१ च्या सुरुवातीला त्याची फिओन्से (साखरपुडा झालेली) वैशाली विश्वेश्वरनशी लग्न केले.
के एल राहुल
के एल राहुल आणि आथिया शेट्टी या वर्षी जानेवारीला लग्नबंधनात अडकलेच. त्यांच्या चाहत्यांना दोघांच्याही लग्नाची प्रतीक्षा होती. आथिया शेट्टी ही सिनेकलाकार सुनी शेट्टी याची मुलगी आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…