भाईंदर ते श्रीवर्धन एसटी सुरू करण्याची मागणी

भाईंदर : मीरा भाईंदरमधील नवघर नाका येथे भाईंदर ते श्रीवर्धन एसटी बस सुरू करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी सुमारे ४०० हुन अधिक जणांनी स्वाक्षरी करून श्रीवर्धन एसटी बस सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. याकरता एसटी महामंडळाकडे पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे.


तरुण वर्ग व कोकणातील चाकरमानी, स्थानिक मनसे सचिव अनिल रानावडे, राजन पवार, अनिल कोटकर, रवी पाष्टे, अभिषेक नांदगावकर, संजय जगताप, उमेश भिऊगडे, विजय काते, निरंजन नवले तसेच समर्थ प्रतिष्ठानच्या महिला व पुरुष पदाधिकारी व मनसे पदाधिकारी यांचा स्वाक्षरी मोहिमेत समावेश होता.


Demand for starting Bhayandar to Shrivardhan ST

मीरा भाईंदर शहरात कोकणामधील चाकरमानी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. यामध्ये भाईंदर ते रायगड मार्गे श्रीवर्धन असा प्रवास करणारे प्रवाशी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोनापूर्वी भाईंदर ते श्रीवर्धन एसटी बस भाईंदर (पूर्व) येथून दररोज सकाळी ६.०० वाजता सुरु होती. मात्र गेल्या २ वर्षांपासून शासनाकडून ही एसटी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्याकरता खासगी वाहन अथवा बोरिवलीला जावे लागते. यामध्ये खासगी वाहनचालक प्रवाशांकडून अवाच्या सव्वा रक्कम घेतात. यामुळे स्थानिकांना नाहक त्रास होत आहे. याकरता भाईंदर ते श्रीवर्धन एसटी बस सेवा पुर्ववत करण्याच्या मागणी करता स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

Comments
Add Comment

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला माणगाव तालुक्यात ७ मार्चपासून सुरुवात

माणगाव : माणगाव तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना विविध प्रकारचे शासकीय दाखले व महसूल विषयक

अलिबाग नगरपालिकेचा १६१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

करवाढ नाही, विकासकामांना प्राधान्य : नगराध्यक्षा अक्षया नाईक अलिबाग : अलिबाग नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन

जिल्हा परिषदेत सत्तासमीकरणाची जुळवाजुळ

जिल्हाधिकारी कार्यालयात १२ मार्चला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया तालुकास्तरावर ११ मार्चला सभापती,

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना