खेड तालुकाच्या हद्दीतील प्रवास सुसाट, तीन पुलांची कामे...

खेड(वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात येत असलेल्या दुसऱ्या जोड पुलाचे काम पूर्ण झाले असून, मार्चअखेर हा पूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. भरणे येथील उड्डाण पूल, जगबुडी नदीवरील पूल आणि दाभीळ येथील उड्डाणपुलाची कामे पूर्ण होत आली असल्याने येत्या काही महिन्यांत महामार्गावरील खेड तालुकाच्या हद्दीतील प्रवास सुसाट होणार आहे.


खेड तालुक्याच्या हद्दीतील जगबुडी नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून मार्च २०१३ मध्ये महाकाली ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसला भीषण अपघात झाला होता. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस मध्यरात्री नदीपात्रात कोसळली होती. या अपघातात ३७ जणांना जीव गमवावा लागला होता. या अपघातानंतर नवीन पूल बांधण्याची मागणी करण्यात आली होती.
जगबुडीवरील दुसऱ्या पुलाचे काम सुरू असल्याने सध्या एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. मात्र, दुसरा पूल वाहतुकीस खुला झाल्यावर या दोन्ही पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होणार आहे, त्यामुळे जगबुडी पुलावरील आधी किंवा आता असलेला अपघाताचा धोका कायमचा संपुष्टात येणार आहे. नव्या पुलाचे कामही पूर्ण झाले असून आता दोन्ही बाजूच्या अप्रोच रोडचे काम सुरू आहे. अप्रोच रोडचे काम पूर्ण झाले की या पुलावरून वाहतूक सुरू केली जाईल, असे बांधकाम विभागाचे अभियंता माडकर यांनी सांगितले. भरणे नाका येथील उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात असून, मार्चअखेर हे काम पूर्ण होणार आहे. त्याशिवाय दाभीळ येथील उड्डाण पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे कामही युद्धपातळीवर सुरू असून, मार्च-एप्रिल दरम्यान पूर्ण होऊन या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणार आहे़.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या