मुंबई: मराठी ज्ञानभाषा आहेच. मात्र, आता सगळ्या प्रकारचे शिक्षण मराठीतून मिळेल. परिणामी मराठी व्यवहारातील ज्ञानभाषा होईल. त्यामुळे मराठीबाबत व्यक्त होत असलेली चिंता पुढे राहणार नाही, असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्धा येथील महात्मा गांधी साहित्य नगरीत सुरु असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या शुभारंभाच्या सत्रात ते बोलत होते.
याप्रसंगी खासदार रामदास तडस व डॉ. अनिल बोंडे, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावर, आमदार समीर मेघे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे तसेच प्रदीप दाते व सागर मेघे उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या शैक्षणिक धोरणात भाषांना नवी दिशा देण्याचे सामर्थ्य आहे. तसेच या वेळी उपमुख्यांनी शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी रुपये राज्य शासनातर्फे देण्याचेही जाहीर केले.