प्रख्यात वकील ॲड. बी.एल.शर्मा यांचे निधन

ठाणे : ठाण्यातील ज्येष्ठ समाजसेवक प्रख्यात वकील ॲड. बी.एल.शर्मा यांचे शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी वयाच्या ६५ व्या वर्षी हदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. भाजपचे वरिष्ठ नेते ओमप्रकाश शर्मा यांचे ते धाकटे बंधु होत.त्यांच्या पश्चात पत्नी मंजु, मुलगा ॲड.विनय आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समस्त शर्मा कुटुंबियांसह आप्तेष्ठ, मित्रपरिवार व राजकिय, सामाजिक आणि प्रसारमाध्यमातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


ठाण्यातील वर्तकनगर, दोस्ती विहार येथे राहणारे ॲड. बी.एल.शर्मा यांनी महाविद्यालयीन काळात अभाविपच्या सेक्रेटरी पदापासुन राजकिय कारकिर्दीचा प्रारंभ केला होता. अखेरच्या श्वासापर्यत ते जनसेवेत कार्यरत होते. ब्रम्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष, राजस्थानी सेवा समितीचे २० वर्षे अध्यक्ष असलेले ॲड. बी.एल.शर्मा यांचे स्व.आनंद दिघे यांच्याशीही चांगले सख्य होते. याच माध्यमातुन मराठी आणि हिंदी भाषिकांना जोडण्यासाठी गेली २९ वर्षे त्यांनी हिंदी भाषा एकता परिषद व राजस्थानी सेवा समितीच्या माध्यमातुन ठाण्यात राष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन केले. गोरगरिबांचे कैवारी असलेले ॲड.बी.एल.शर्मा हे गरीब व्यक्तीकडुन कधीही वकिलीचे शुल्क घेत नसत. ग्रामीण वनवासी भागात सामुदायिक विवाह सोहळे तसेच अनेक जनहिताचे उपक्रम त्यांनी राबवले. त्यांच्या अकाली निधनाबद्दल सर्व स्तरातुन शोक व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित