प्रख्यात वकील ॲड. बी.एल.शर्मा यांचे निधन

  78

ठाणे : ठाण्यातील ज्येष्ठ समाजसेवक प्रख्यात वकील ॲड. बी.एल.शर्मा यांचे शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी वयाच्या ६५ व्या वर्षी हदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. भाजपचे वरिष्ठ नेते ओमप्रकाश शर्मा यांचे ते धाकटे बंधु होत.त्यांच्या पश्चात पत्नी मंजु, मुलगा ॲड.विनय आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समस्त शर्मा कुटुंबियांसह आप्तेष्ठ, मित्रपरिवार व राजकिय, सामाजिक आणि प्रसारमाध्यमातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


ठाण्यातील वर्तकनगर, दोस्ती विहार येथे राहणारे ॲड. बी.एल.शर्मा यांनी महाविद्यालयीन काळात अभाविपच्या सेक्रेटरी पदापासुन राजकिय कारकिर्दीचा प्रारंभ केला होता. अखेरच्या श्वासापर्यत ते जनसेवेत कार्यरत होते. ब्रम्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष, राजस्थानी सेवा समितीचे २० वर्षे अध्यक्ष असलेले ॲड. बी.एल.शर्मा यांचे स्व.आनंद दिघे यांच्याशीही चांगले सख्य होते. याच माध्यमातुन मराठी आणि हिंदी भाषिकांना जोडण्यासाठी गेली २९ वर्षे त्यांनी हिंदी भाषा एकता परिषद व राजस्थानी सेवा समितीच्या माध्यमातुन ठाण्यात राष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन केले. गोरगरिबांचे कैवारी असलेले ॲड.बी.एल.शर्मा हे गरीब व्यक्तीकडुन कधीही वकिलीचे शुल्क घेत नसत. ग्रामीण वनवासी भागात सामुदायिक विवाह सोहळे तसेच अनेक जनहिताचे उपक्रम त्यांनी राबवले. त्यांच्या अकाली निधनाबद्दल सर्व स्तरातुन शोक व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता