मोदी सरकारचा चीनवर पुन्हा एकदा डिजिलट स्ट्राईक.....

  101

मुंबई: भारत सरकारने सुमारे २३० चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत, ज्यात १३८ बेटिंग अ‍ॅप्स आणि ९४ कर्ज देणार्‍या अ‍ॅप्सचा समावेश आहे, गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) ही कारवाई सुरू केली आहे.


सरकारने सुमारे २८८ चिनी अप्सची तपासणी सहा महिन्यांपूर्वी सुरू केली होती. त्यानंतर प्राप्त झालेल्या अहवालात या अ‍ॅप्सद्वारे भारतीय नागरिकांचा खाजगी डेटा अ‍ॅक्सेस केला जातो, अशी माहिती समोर आली आहे. या अ‍ॅपद्वारे लोकांना कर्ज घेण्याचे आमिष दाखवले जाते आणि नंतर ते वार्षिक तब्बल ३ टक्क्यांपर्यंत व्याज वाढवतात. नंतर या अ‍ॅप्सच्या प्रतीनीधींकडून कर्जदारांना त्रास दिला जातो अशी माहिती मिळाली आहे. हे मोबाईल अ‍ॅप्स चालवणाऱ्या कंपन्या आणि व्यक्ती कर्जदारांकडून खंडणीसाठी छळ करत असल्याचा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने ही कारवाई करण्यात येत आहे.


हे अ‍ॅप्स मुळ अ‍ॅप्सची क्लोन आवृत्ती असून त्यामुळे अनेक सुरक्षेचे धोके आहेत. जून २०२० मध्ये, सरकारने ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली होती आणि नंतर १० ऑगस्ट २२२० मध्येही ४७ अ‍ॅप्स ब्लॉक केले होते. केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने भारताच्या काही भागात बेटिंग आणि जुगार बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याची जाहीरात करणे देखील ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ नुसार बेकायदेशीर आहे.

Comments
Add Comment

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी