सफाई कामगारांना न्यायालयाचा दिलासा

मुंबई : न्यायालयाने १५ फेब्रुवारी पर्यंत सफाई कामगारांच्या वसाहतीतील वीज, पाणी कापण्याची घाई करू नये, असे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. या कामगारांना ७ दिवसात घरे खाली करण्यासाठी पालिकेने नोटीस बजावली होती. याविरोधात सफाई कामगारांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने त्यांना तात्पूरता का होईना पण दिलासा दिला आहे.


स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सफाई कामगार १९५० पासून महापालिकेच्या वसाहतीमध्ये पिढ्यानपिढ्या राहत आहेत. या वसाहतींचे बांधकाम जीर्ण झाल्याने मुंबई महापालिकेद्वारे सफाई कामगारांच्या या तीस वसाहती अक्षय योजनेअंतर्गत कंत्राट काढून सेवानिवासस्थान म्हणून विकसित करण्यात येणार आहेत.


पालिकेच्या वसाहतीत राहणाऱ्या कामगारांना १४ हजार रुपये आणि घर भाडेभत्ता किंवा व्हिडिओकॉन चेंबुर वाशी नाका येथे स्थलांतरासाठी पर्याय दिला आहे. परंतु पालिका या कामगारांमा हक्काची घरे परत कधी करणार असा सवाल उपस्थीत करत या कामगारांनी न्यायालयात धाव घेतली. याबाबत कामगारांना न्यायायलयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.



पालिकेकडून अद्याप काहीच स्पष्ट नाही


याबाबत बोलताना, कायमस्वरूपी घरांसंबंधी पालिका प्रशासन काहीच स्पष्ट करत नाही. तसेच पालिका आयुक्तही त्याची दखल घेत नाहीत, असे सांगत आपण लवकरच आपण आपली बाजू न्यालयात मांडणार असल्याचे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गोविंदभाई परमार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महापालिका आयुक्त भिडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची घेतली काळजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उष्माघात, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि उष्णतेमुळे होणाऱ्या इतर आरोग्य समस्यांपासून

Mumbai Fire Brigade : मुंबईत वाढत्या उन्हामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ, अग्निशमन दलाने केले दक्षतेचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या तापमानामुळे घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच

CM Student Science Wari : 'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी' उपक्रमाला शासनाची मान्यता

मुंबई : ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट

Gymkhana : राज्यातील जिमखान्यांच्या भाडेपट्ट्याबाबत लवकरच नवीन धोरण

मुंबई : मुंबई शहरासह संपूर्ण राज्यातील शासकीय जमिनींवर उभारण्यात आलेल्या जिमखान्यांचे भाडेपट्टे संपुष्टात

मुंबई वॉटर मेट्रोच्या आराखड्याला गती ,मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

काल्हेर, वाशी, गेट वे ऑफ इंडिया आणि नवी मुंबई विमानतळ स्थानकांचा समावेश मुंबई : मुंबईकरांना गर्दी आणि वाहतूक

BMCT : बीएमसीटीमध्ये ११३ स्थानिक सुरक्षारक्षकांना कामावरून कमी; विधानसभा उपाध्यक्षांनी मागविला अहवाल

मुंबई : भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) येथे कार्यरत असलेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त ११३ सुरक्षारक्षक