सफाई कामगारांना न्यायालयाचा दिलासा

मुंबई : न्यायालयाने १५ फेब्रुवारी पर्यंत सफाई कामगारांच्या वसाहतीतील वीज, पाणी कापण्याची घाई करू नये, असे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. या कामगारांना ७ दिवसात घरे खाली करण्यासाठी पालिकेने नोटीस बजावली होती. याविरोधात सफाई कामगारांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने त्यांना तात्पूरता का होईना पण दिलासा दिला आहे.


स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सफाई कामगार १९५० पासून महापालिकेच्या वसाहतीमध्ये पिढ्यानपिढ्या राहत आहेत. या वसाहतींचे बांधकाम जीर्ण झाल्याने मुंबई महापालिकेद्वारे सफाई कामगारांच्या या तीस वसाहती अक्षय योजनेअंतर्गत कंत्राट काढून सेवानिवासस्थान म्हणून विकसित करण्यात येणार आहेत.


पालिकेच्या वसाहतीत राहणाऱ्या कामगारांना १४ हजार रुपये आणि घर भाडेभत्ता किंवा व्हिडिओकॉन चेंबुर वाशी नाका येथे स्थलांतरासाठी पर्याय दिला आहे. परंतु पालिका या कामगारांमा हक्काची घरे परत कधी करणार असा सवाल उपस्थीत करत या कामगारांनी न्यायालयात धाव घेतली. याबाबत कामगारांना न्यायायलयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.



पालिकेकडून अद्याप काहीच स्पष्ट नाही


याबाबत बोलताना, कायमस्वरूपी घरांसंबंधी पालिका प्रशासन काहीच स्पष्ट करत नाही. तसेच पालिका आयुक्तही त्याची दखल घेत नाहीत, असे सांगत आपण लवकरच आपण आपली बाजू न्यालयात मांडणार असल्याचे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गोविंदभाई परमार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

Comments
Add Comment

Weastern Railway : पश्चिम रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण

मुंबई : पश्चिम रेल्वेने आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Forest Minister Ganesh Naik : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी १ हजार गावांमध्ये 'एआय अर्लट' यंत्रणा

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव

Revenue Minister Bawankule : चाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर आता गवत लागवड!

 बचत गट आणि बेरोजगार संस्थांशी भाडेकरार ; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना मुंबई : गाव,

State President Ravindra Chavan : विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी भाजपकडून ४८ नावांची यादी तयार

दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

८९ हजार कोटींच्या ५ प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० हजार रोजगार निर्माण होणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मुंबई :