भारत पाकिस्तानचे पाणी रोखणार!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारने सप्टेंबर १९६० च्या सिंधू जल करारामध्ये सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे.


भारत सरकारने सांगितले की, भारताने परस्पर मध्यस्थीचा मार्ग शोधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही, पाकिस्तानने २०१७ ते २०२२ या कालावधीत कायमस्वरूपी सिंधू आयोगाच्या पाच बैठकांमध्ये या विषयावर चर्चा करण्यास नकार दिला. या कारणांमुळे आता पाकिस्तानला नोटीस बजावण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.


सरकारने या नोटिशीत म्हटले आहे की, पाकिस्तानच्या चुकीच्या कृतींचा सिंधू जल कराराच्या तरतुदींवर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम झाला आहे. भारताला आयडब्ल्यूटीच्या सुधारणेसाठी नोटीस जारी करण्यास भाग पाडले आहे. २०१५ मध्ये पाकिस्तानने भारताच्या किशनगंगा आणि रतले हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्सवरील तांत्रिक आक्षेप तपासण्यासाठी तटस्थ तज्ज्ञाची नियुक्ती करण्याची विनंती केली होती. २०१६ मध्ये पाकिस्तानने ही विनंती एकतर्फी मागे घेतली आणि लवादाच्या न्यायालयाने त्यांच्या आक्षेपांवर निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव दिला. पाकिस्तानची ही एकतर्फी कारवाई आयडब्ल्यूटीच्या कलमआयएक्सचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.


भारत सरकारने जारी केलेल्या नोटिशीचे मुख्य कारण म्हणजे, आयडब्ल्यूटीचे उल्लंघन सुधारण्यासाठी पाकिस्तानला ९० दिवसांच्या आत सरकारी वाटाघाटींमध्ये सहभागी होण्याची संधी प्रदान करणे आहे. दरम्यान, जागतिक बँकेने अलीकडेच तटस्थ तज्ज्ञ आणि लवाद न्यायालय या दोन्ही प्रक्रिया सुरू केल्या आहेत.

Comments
Add Comment

Gas Supply Changes : स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात होणार बदल

नवी दिल्ली : स्ट्रेट ऑफ होर्मुझ भागातील वाढत्या लष्करी आणि राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने

Randhir Jaiswal : पीओजेकेतील निवडणुका दिखावा, मानवी हक्क उल्लंघन लपवण्याचा प्रयत्न- रणधीर जयस्वाल

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीर (पीओजेके) येथे घेतल्या जात असलेल्या तथाकथित विधानसभा

Narendra Modi : आसाममधील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची खासदारांसोबत आढावा बैठक

नवी दिल्ली : आसाममधील भीषण पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यातील

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार; चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित

पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस, मालदेवतामध्ये २३३ मिमी पावसाची शक्यता देहरादून : उत्तराखंडमध्ये सक्रिय

Himachal Pradesh : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Suneel Anand Passed Away : अभिनेते देव आनंद यांच्या मुलाचे निधन; ज्या रुग्णालयात वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, तिथेच लेकाचाही मृत्यू

लंडन : हिंदी चित्रपटसृष्टीचे सदाबहार अभिनेते दिवंगत देव आनंद (Dev Anand) यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला