भारत पाकिस्तानचे पाणी रोखणार!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारने सप्टेंबर १९६० च्या सिंधू जल करारामध्ये सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे.


भारत सरकारने सांगितले की, भारताने परस्पर मध्यस्थीचा मार्ग शोधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही, पाकिस्तानने २०१७ ते २०२२ या कालावधीत कायमस्वरूपी सिंधू आयोगाच्या पाच बैठकांमध्ये या विषयावर चर्चा करण्यास नकार दिला. या कारणांमुळे आता पाकिस्तानला नोटीस बजावण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.


सरकारने या नोटिशीत म्हटले आहे की, पाकिस्तानच्या चुकीच्या कृतींचा सिंधू जल कराराच्या तरतुदींवर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम झाला आहे. भारताला आयडब्ल्यूटीच्या सुधारणेसाठी नोटीस जारी करण्यास भाग पाडले आहे. २०१५ मध्ये पाकिस्तानने भारताच्या किशनगंगा आणि रतले हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्सवरील तांत्रिक आक्षेप तपासण्यासाठी तटस्थ तज्ज्ञाची नियुक्ती करण्याची विनंती केली होती. २०१६ मध्ये पाकिस्तानने ही विनंती एकतर्फी मागे घेतली आणि लवादाच्या न्यायालयाने त्यांच्या आक्षेपांवर निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव दिला. पाकिस्तानची ही एकतर्फी कारवाई आयडब्ल्यूटीच्या कलमआयएक्सचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.


भारत सरकारने जारी केलेल्या नोटिशीचे मुख्य कारण म्हणजे, आयडब्ल्यूटीचे उल्लंघन सुधारण्यासाठी पाकिस्तानला ९० दिवसांच्या आत सरकारी वाटाघाटींमध्ये सहभागी होण्याची संधी प्रदान करणे आहे. दरम्यान, जागतिक बँकेने अलीकडेच तटस्थ तज्ज्ञ आणि लवाद न्यायालय या दोन्ही प्रक्रिया सुरू केल्या आहेत.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या