पोलीस शिपाई व चालक पदांसाठी उच्चशिक्षितांचे अर्ज!

राज्यातल्या बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव उघड!



  • अनिकेत देशमुख


भाईंदर : मिरा-भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या शिपाई व चालक पदांसाठी थेट भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव आता पुन्हा एकदा समोर आले आहे. संपूर्ण देशात बेरोजगारीची परिस्थिती अशी आहे की उच्चशिक्षित पदवीधर उमेदवारही शिपाई व चालक पदाच्या नोकरीसाठी अर्ज करत असल्याचे चित्र दिसत आहे. मिरा-भाईंदर, वसई विरार येथील पोलिसांच्या शिपाई व चालक पदांसाठी भरतीसाठी बीटेक, एमबीए, पीएचडी, एमएससी आणि एमटेक केलेल्या उमेदवारांनीही या भरतीसाठी अर्ज केले असल्याची माहिती पोलीस आयुक्तलयामार्फत देण्यात आली.


मिरा-भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या शिपाई व चालक पदांसाठी ९९६ पोलीस पदांसाठी ही भरती सुरू आहे. या पदांसाठी सुमारे ७४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. वाहन चालक पदाकरता एकूण १० जागा असून पोलीस शिपाई पदासाठी ९८६ जागा आहेत.


कोरोनाच्या काळानंतर अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या असून व्यवसाय देखील बंद पडले आहेत. मोठमोठ्या पदव्या घेऊन शिक्षण पूर्ण करून देखील तरुणवर्ग बेरोजगार असल्याने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उच्चशिक्षितांनी देखील पोलीस भरतीच्या शर्यतीत भाग घेतला आहे.


मीरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालयातील पोलीस भरती मध्ये मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित तरुणांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यात बीटेक(१४१), एम.ई (४), बी.ई (३७१), एम.बी.ए (४५), बी.बी.ए (८१), बी.फार्म (५०), बी.कॉम (४४७३), एम कॉम (५२९), एम.एस.सी (२७९), बी.एस.सी(३९५२), एल.एल.बी (१०), एम.ए (१७३७), बी.ए (१४,८४३), बी.बी.एम (२४), बी.सी.ए(२६८), बी.एड (८), बी.एम.एस (६४), बी.पी.एड (२०), एम.पी.एड(३), बी.सी.एस (१५८), बी.एस. डब्ल्यू (३१), एम.एस.डब्ल्यू (४१) असे उच्चशिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षितांचे पोलीस भरतीसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी किती उच्चशिक्षितांचे नशीब उजळणार असून भरती करता पात्र ठरणार आहेत हे भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कळणार आहे.


दरम्यान, भरती प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया जलद, अचूक व पारदर्शक होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे वेळ आणि श्रम कमी होणार आहे. भरतीसाठी कोणीही पैशांची मागणी करत असेल तर उमेदवारांनी तातडीने त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन प्रकाश गायकवाड, उपायुक्त, मुख्यालय, मिरा-भाईंदर, वसई विरार यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

प्राइम व्हिडिओने ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा दमदार ट्रेलर रिलीज; जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार

मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३  चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरांची लाखोंची फसवणूक; नक्की घडलं तरी काय ?

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्ष उसगावकर यांची लाखोंची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे.