पोलीस शिपाई व चालक पदांसाठी उच्चशिक्षितांचे अर्ज!

  84

राज्यातल्या बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव उघड!



  • अनिकेत देशमुख


भाईंदर : मिरा-भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या शिपाई व चालक पदांसाठी थेट भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव आता पुन्हा एकदा समोर आले आहे. संपूर्ण देशात बेरोजगारीची परिस्थिती अशी आहे की उच्चशिक्षित पदवीधर उमेदवारही शिपाई व चालक पदाच्या नोकरीसाठी अर्ज करत असल्याचे चित्र दिसत आहे. मिरा-भाईंदर, वसई विरार येथील पोलिसांच्या शिपाई व चालक पदांसाठी भरतीसाठी बीटेक, एमबीए, पीएचडी, एमएससी आणि एमटेक केलेल्या उमेदवारांनीही या भरतीसाठी अर्ज केले असल्याची माहिती पोलीस आयुक्तलयामार्फत देण्यात आली.


मिरा-भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या शिपाई व चालक पदांसाठी ९९६ पोलीस पदांसाठी ही भरती सुरू आहे. या पदांसाठी सुमारे ७४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. वाहन चालक पदाकरता एकूण १० जागा असून पोलीस शिपाई पदासाठी ९८६ जागा आहेत.


कोरोनाच्या काळानंतर अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या असून व्यवसाय देखील बंद पडले आहेत. मोठमोठ्या पदव्या घेऊन शिक्षण पूर्ण करून देखील तरुणवर्ग बेरोजगार असल्याने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उच्चशिक्षितांनी देखील पोलीस भरतीच्या शर्यतीत भाग घेतला आहे.


मीरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालयातील पोलीस भरती मध्ये मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित तरुणांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यात बीटेक(१४१), एम.ई (४), बी.ई (३७१), एम.बी.ए (४५), बी.बी.ए (८१), बी.फार्म (५०), बी.कॉम (४४७३), एम कॉम (५२९), एम.एस.सी (२७९), बी.एस.सी(३९५२), एल.एल.बी (१०), एम.ए (१७३७), बी.ए (१४,८४३), बी.बी.एम (२४), बी.सी.ए(२६८), बी.एड (८), बी.एम.एस (६४), बी.पी.एड (२०), एम.पी.एड(३), बी.सी.एस (१५८), बी.एस. डब्ल्यू (३१), एम.एस.डब्ल्यू (४१) असे उच्चशिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षितांचे पोलीस भरतीसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी किती उच्चशिक्षितांचे नशीब उजळणार असून भरती करता पात्र ठरणार आहेत हे भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कळणार आहे.


दरम्यान, भरती प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया जलद, अचूक व पारदर्शक होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे वेळ आणि श्रम कमी होणार आहे. भरतीसाठी कोणीही पैशांची मागणी करत असेल तर उमेदवारांनी तातडीने त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन प्रकाश गायकवाड, उपायुक्त, मुख्यालय, मिरा-भाईंदर, वसई विरार यांनी केले आहे.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Ajit Pawar: माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं!

पुणे: प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पारडं

Passenger Jump from Plane: आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी विमानातून मारल्या उड्या, १८ जण जखमी; कुठे घडली ही घटना? जाणून घ्या

स्पेन: गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर, विमानांच्या लहान-मोठ्या अपघातांबद्दलच्या

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या