फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा आघाडी सरकारचा डाव

  119

मुंबई: गेल्या अडीज वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात माझ्यावर वेळोवेळी नवनवीन केसेसे टाकता येतील याचे प्रयत्न करण्यात आले. कुठल्याही परिस्थीतीत याला अडकवा अशी जबाबदारीच तत्कालीन सीपी संजय पांडे यांच्यावर सोपण्यात आल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.



हे देखील वाचा.. शिंदेच्या गटाच्या जागांवर भाजपचा दावा नाही


पाच वर्ष ज्यांच्यासोबत काम केलं त्या उद्धवजींबाबत माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. पण खुद्द उद्धवजींनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. माझा एक साधा फोनही उचलला नाही. माझ्याशी साधं बोलण्याचं सौजन्यही त्यांनी दाखवलं नाही.


एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.



बाळासाहेब काही खासगी प्रॉपर्टी नाही


बाळासाहेबांचा आम्ही फोटो लावतो, तुम्ही मोदींचा लावा पाहु! असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं होतं. त्यावर फडणवीसांनी तुम्हीच बाळासाहेबांच्या फोटोपेक्षा मोदींचा फोटो लावला अन् 2014च्या निवडणूकीत निवडून आलात. त्यामुळे आधी इतिहास तपासून घ्या असा सल्लाच फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. दरम्यान बाळासाहेब काही खासगी प्रॉपर्टी नाही. बाळासाहेब महाराष्ट्राचे आहेत, अशी भावनाही फडणवीस यांनी व्यक्त केली.



रश्मी वहिनींना भेटलो आणि म्हणालो...


माझं उद्धव ठाकरेंसोबत काही वैयक्तिक वैर नाही. मी आजही त्यांच्यासोबत चहा पिऊ शकतो. परवाच एका कार्यक्रमात मला रश्मी वहिनी भेटल्या. मी त्यांना उद्धवजींना माझा नमस्कार सांगा असं म्हणालो. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या