फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा आघाडी सरकारचा डाव

मुंबई: गेल्या अडीज वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात माझ्यावर वेळोवेळी नवनवीन केसेसे टाकता येतील याचे प्रयत्न करण्यात आले. कुठल्याही परिस्थीतीत याला अडकवा अशी जबाबदारीच तत्कालीन सीपी संजय पांडे यांच्यावर सोपण्यात आल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.



हे देखील वाचा.. शिंदेच्या गटाच्या जागांवर भाजपचा दावा नाही


पाच वर्ष ज्यांच्यासोबत काम केलं त्या उद्धवजींबाबत माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. पण खुद्द उद्धवजींनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. माझा एक साधा फोनही उचलला नाही. माझ्याशी साधं बोलण्याचं सौजन्यही त्यांनी दाखवलं नाही.


एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.



बाळासाहेब काही खासगी प्रॉपर्टी नाही


बाळासाहेबांचा आम्ही फोटो लावतो, तुम्ही मोदींचा लावा पाहु! असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं होतं. त्यावर फडणवीसांनी तुम्हीच बाळासाहेबांच्या फोटोपेक्षा मोदींचा फोटो लावला अन् 2014च्या निवडणूकीत निवडून आलात. त्यामुळे आधी इतिहास तपासून घ्या असा सल्लाच फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. दरम्यान बाळासाहेब काही खासगी प्रॉपर्टी नाही. बाळासाहेब महाराष्ट्राचे आहेत, अशी भावनाही फडणवीस यांनी व्यक्त केली.



रश्मी वहिनींना भेटलो आणि म्हणालो...


माझं उद्धव ठाकरेंसोबत काही वैयक्तिक वैर नाही. मी आजही त्यांच्यासोबत चहा पिऊ शकतो. परवाच एका कार्यक्रमात मला रश्मी वहिनी भेटल्या. मी त्यांना उद्धवजींना माझा नमस्कार सांगा असं म्हणालो. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे.
Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या