फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा आघाडी सरकारचा डाव

मुंबई: गेल्या अडीज वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात माझ्यावर वेळोवेळी नवनवीन केसेसे टाकता येतील याचे प्रयत्न करण्यात आले. कुठल्याही परिस्थीतीत याला अडकवा अशी जबाबदारीच तत्कालीन सीपी संजय पांडे यांच्यावर सोपण्यात आल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.



हे देखील वाचा.. शिंदेच्या गटाच्या जागांवर भाजपचा दावा नाही


पाच वर्ष ज्यांच्यासोबत काम केलं त्या उद्धवजींबाबत माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. पण खुद्द उद्धवजींनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. माझा एक साधा फोनही उचलला नाही. माझ्याशी साधं बोलण्याचं सौजन्यही त्यांनी दाखवलं नाही.


एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.



बाळासाहेब काही खासगी प्रॉपर्टी नाही


बाळासाहेबांचा आम्ही फोटो लावतो, तुम्ही मोदींचा लावा पाहु! असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं होतं. त्यावर फडणवीसांनी तुम्हीच बाळासाहेबांच्या फोटोपेक्षा मोदींचा फोटो लावला अन् 2014च्या निवडणूकीत निवडून आलात. त्यामुळे आधी इतिहास तपासून घ्या असा सल्लाच फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. दरम्यान बाळासाहेब काही खासगी प्रॉपर्टी नाही. बाळासाहेब महाराष्ट्राचे आहेत, अशी भावनाही फडणवीस यांनी व्यक्त केली.



रश्मी वहिनींना भेटलो आणि म्हणालो...


माझं उद्धव ठाकरेंसोबत काही वैयक्तिक वैर नाही. मी आजही त्यांच्यासोबत चहा पिऊ शकतो. परवाच एका कार्यक्रमात मला रश्मी वहिनी भेटल्या. मी त्यांना उद्धवजींना माझा नमस्कार सांगा असं म्हणालो. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे.
Comments
Add Comment

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक