कराची : महागाई आणि आर्थिक संकटाशी झगडणाऱ्या पाकिस्तानला आता वीज संकटाला देखील तोंड द्यावे लागत आहे. सोमवारी संपूर्ण पाकिस्तानात वीजपुरवठा खंडीत झाला. इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीसारखी पाकिस्तानातील मोठी शहरे अनेक तासांपासून अंधारात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानवर संकट कोसळले आहे. दैनंदिन वापरात असलेल्या सर्वच वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मागील आठवड्यात केंद्र सरकारकडून अन्न वाटप करताना नागरिकांमध्ये हाणामारी झाली होती. तर आता पाकिस्तानमध्ये वीज व्यवस्था बिघडली आहे.
पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पाकिस्तानच्या नॅशनल ग्रीडची सिस्टम फ्रिक्वेन्सी बिघडली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने देशभरातील वीज यंत्रणा प्रभावित झाली आहे. दुरुस्तीचे काम सुरू आहे. पाकिस्तानच्या मीडिया संस्थांनीही कराची, लाहोरमधील अनेक भागात वीज नसल्याचे सांगितले आहे.
उर्जा मंत्री खुर्रम दस्तागीर यांनी जिओ न्यूजला सांगितले की, वीज बचतीसाठी हिवाळ्यात पाकिस्तानामध्ये वीजनिर्मिती युनिट्स बंद ठेवले जातात. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जेव्हा यंत्रणा चालू केली. तेव्हा उत्तर पाकिस्तानातील क्षेत्राच्या व्होल्टेजमध्ये दबाव आला. त्यामुळे एकामागून एक अशी यंत्रणेत बिघाड होत गेली. माध्यमांतून सांगण्यात येत आहे की, वीज यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी ८ ते १० तास लागू शकतात. त्यामुळे लोकांना वीजेविना काही तास राहावे लागणार आहे.
गेल्यावर्षी देखील ऑक्टोबरमध्येही पाकिस्तानमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर कराची, लाहोरसारख्या शहरांमध्ये सुमारे १२ तास वीजपुरवठा झाला नव्हता.
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…