समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या सुस्साट वेगाला कारवाईचा ब्रेक

  107

महिनाभरात ९ लाखांच्या दंडाची वसुली


नागपूर (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र, समृद्धी महामार्गाने प्रवासाची वेळ वाचत असला तरी वाहनांच्या अपघातांच्या वाढत्या संख्येने चिंता वाढली होती. अतिवेगाने धावत असलेल्या वाहनांना लगाम लावण्यासाठी पोलिसांनी स्पीडगनच्या माध्यमातून कारवाईस सुरू केली आहे. विदर्भात ६५०वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यातून ९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.


प्रशस्त महामार्गामुळे वाहनधारकांना कमी वेळात लवकर प्रवास करणे शक्य होत आहे. मात्र, प्रवासादरम्यान वाहनांचा वेग हा प्रति तास १२० हून अधिक असतो. त्यामुळे वाहने अनियंत्रित होऊन अपघात घडत आहेत. सुस्साट वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी पोलीस खात्यावर देण्यात आली आहे. राज्य महामार्ग पोलिसांनी स्पीडगनद्वारे गेल्या महिनाभरात ६५० वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक कारवाई करण्यात आली. वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत १७३ वेगवान वाहनांवर कारवाई करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात ४५वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच नो पार्किंगसह महामार्गावर सेल्फी काढणाऱ्या वाहन चालकांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी