थंड पाण्यात शिजणारा आसामचा ‘बोका राईस’

Share

बक्सा : भात मुख्यत: गरम पाण्यात शिजवला जातो. पण तुम्ही कधी थंड पाण्यात शिजणाऱ्या तांदळाबाबत ऐकलंय का? ते ‘बोका राईस’ नावाचे भात आपल्या भारतातच पिकते.

भारतात भातापासून अनेक पदार्थ बनवले जातात. बरेच लोक तांदूळ पाण्यात उकडून खातात. भात शिजवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. पण हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की, असा एक तांदळाचा प्रकार आपल्या देशात पिकवला जातो, ज्यासाठी तुम्हाला गरम पाणी किंवा पाणी उकळण्याची गरजच भासत नाही, तर फक्त थंड पाण्यातच हा तांदूळ शिजतो. एक विशेष प्रकारचा तांदूळ (बोका सॉल) जो सामान्य पाण्यात ठेवल्यानंतर ४५-६० मिनिटांत खायला तयार होतो आणि कोणत्याही आचेवर, गॅसवर किंवा चुलीवर शिजवावा लागत नाही. आणि ते सामान्य भातासारखे दिसते.

आसाममध्ये पिकणारा बोका राईस मॅजिक राईस म्हणूनही ओळखला जातो. नैसर्गिक सुबत्तेचे वरदान लाभलेल्या आसामची माती आणि तेथील हवामान यामुळे या तांदळाला एक वेगळीच चव आणि सुगंध असतो. बोका राईसची लागवड आसाममधील कोक्राझार, बारपेटा, नलबारी, बक्सा, धुबरी, दररंग, कामरूप या भागांत प्रामुख्याने केली जाते.

आसाममध्ये खरीप हंगामात म्हणजेच, जून महिन्यात बोका राईसची पेरणी केली जाते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीक तयार होते. बोका तांदूळ किंवा बोका राईसची लागवड आसामच्या डोंगराळ भागांत राहणारे आदिवासी करतात. या तांदळात १०.७३ टक्के फायबर आणि ६.८ टक्के प्रोटीन असते. याशिवाय बोका तांदळात अनेक प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पोषक घटकही असतात. जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.

इतिहासाची पाने उलटली तर बोका राईसचा एक सुवर्ण इतिहास नक्कीच वाचायला मिळेल. याच तांदळापासून शिजवण्यात आलेल्या भाताने अनेक शत्रूंचा खात्मा करण्यास मदत केली आहे. तसेच, याच तांदळाच्या मदतीने कित्येक युद्धे जिंकायला मदत केली आहे. ही कथा सतराव्या शतकातील आहे. जेव्हा अहोम सैनिक मुघल सैन्यापासून देशाचं रक्षण करण्यासाठी बोका राईस खात होते. हा तांदूळ सैनिकांचं राशन म्हणून युद्धात नेण्यात आला होता. या तांदळाला शिजवण्याची गरज नसल्यामुळे सैनिकांना युद्धभूमीवर त्याचं सेवन करणं सोयीचं ठरत होतं.

बोका राईस ५० ते ६० मिनिटं पाण्यात भिजवल्यानंतर भात तयार व्हायचा. हा तांदूळ बोका राईस, बोका चोले आणि ओरिझा सॅटिवा म्हणून ओळखला जातो. आसाममधील बोका तांदळापासून अनेक प्रकारचे पारंपारिक पदार्थ बनवले जातात, ज्यामध्ये बोका तांदूळ दही, गूळ, दूध, साखर किंवा इतर खाद्यपदार्थांसोबत दिला जातो.

बोका राईसचा अनेक हजार वर्षांचा इतिहास आहे, जो थेट आसामशी संबंधित आहे. यामुळेच भारत सरकारने आसाममध्ये पिकवल्या जाणाऱ्या या तांदळाला जीआय टॅगही दिला आहे. आता या तांदळाची लागवड पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही केली जाते.

बोका राईस शिजवायला जेवढा सोपा आहे, तेवढेच अवघड तो पिकवणे आहे. अर्धा एकर शेतातून केवळ पाच पोती तांदळाचे उत्पन्न येते. इतर तांदळाच्या जातींच्या तुलनेत हा तांदूळ १४५ दिवसांत पिकून काढणीला येतो.

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

1 hour ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

2 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

4 hours ago