मुंबई महापालिकेतील सर्व पक्षांची कार्यालये आणि समितीच्या अध्यक्षांची दालने सील

Share

शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांचा निर्णय

मुंबई : मुंबई महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालये सील करण्यात आली आहेत. शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांनी निर्णय केला आहे. आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत सर्वच पक्षांची कार्यालये तात्पुरती सील करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालयच नाही तर विविध समितीच्या अध्यक्षांची दालने सुद्धा सील करण्यात आली आहेत.

खासदार राहुल शेवाळे, नरेश म्हस्के, यशवंत जाधव, शीतल म्हात्रे आणि गिरीश धानुरकर यांच्यासह शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काल मुंबई महापालिकेत जाऊन शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावर आपला हक्क सांगितला. ती बातमी कळताच शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही मुंबई महापालिका गाठली. त्यामुळे सर्वांना बाहेर काढून कार्यालय सील केले. तर आज सकाळी सर्व पक्षांची कार्यालये आणि अध्यक्षांची दालने सील केली.

शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची आधी भेट घेतली. मग त्यांनी शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दाखल होण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला आणि घोषणाही दिल्या. त्यानंतर ते कार्यालयात घुसल्याचे समजताच शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे त्यांना आवर घालताना मुंबई पोलिसांची तारांबळ उडाली होती. अखेर बीएमसीच्या सुरक्षारक्षकांना सोबत घेऊन मुंबई पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पालिकेच्या इमारतीबाहेर काढले आणि कार्यालय सील केले.

Recent Posts

पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे दोन धक्कादायक व्हिडीओ

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक…

7 minutes ago

बत्ती गुल, युरोपमध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे पसरला अंधार

स्पेन : वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे युरोपमधील काही देशांमध्ये अंधार पसरला आहे. स्पेन, फ्रान्स आणि…

42 minutes ago

Weightloss Tips: वजन कमी करण्यासाठी दह्यात ‘हे’ २ पदार्थ मिसळून खा!

मुंबई : उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात तुमच्या…

44 minutes ago

अल्टीमेटमनंतरही भारत न सोडणाऱ्या पाकड्यांना होणार ‘ही’ कठोर शिक्षा

निश्चित मुदतीनंतरही भारत न सोडणाऱ्या पाक नागरिकांना होणार तुरुंगवास, कायद्यात देखील आहे तरतूद नवी दिल्ली:…

59 minutes ago