मुंबई महापालिकेतील सर्व पक्षांची कार्यालये आणि समितीच्या अध्यक्षांची दालने सील

शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांचा निर्णय


मुंबई : मुंबई महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालये सील करण्यात आली आहेत. शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांनी निर्णय केला आहे. आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत सर्वच पक्षांची कार्यालये तात्पुरती सील करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालयच नाही तर विविध समितीच्या अध्यक्षांची दालने सुद्धा सील करण्यात आली आहेत.


खासदार राहुल शेवाळे, नरेश म्हस्के, यशवंत जाधव, शीतल म्हात्रे आणि गिरीश धानुरकर यांच्यासह शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काल मुंबई महापालिकेत जाऊन शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावर आपला हक्क सांगितला. ती बातमी कळताच शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही मुंबई महापालिका गाठली. त्यामुळे सर्वांना बाहेर काढून कार्यालय सील केले. तर आज सकाळी सर्व पक्षांची कार्यालये आणि अध्यक्षांची दालने सील केली.


शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची आधी भेट घेतली. मग त्यांनी शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दाखल होण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला आणि घोषणाही दिल्या. त्यानंतर ते कार्यालयात घुसल्याचे समजताच शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे त्यांना आवर घालताना मुंबई पोलिसांची तारांबळ उडाली होती. अखेर बीएमसीच्या सुरक्षारक्षकांना सोबत घेऊन मुंबई पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पालिकेच्या इमारतीबाहेर काढले आणि कार्यालय सील केले.

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित