'आम्हाला मान खाली घालावी लागेल, इतकी हिंमत कुणाच्या बापात नाही'

  111

कर्नाटकविरोधात ठराव आज किंवा उद्या मांडणार; देवेंद्र फडणवीसांनी सुनावले


नागपूर : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल, इतकी हिंमत कुणाच्या बापात नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावरून आरोप करणाऱ्या विरोधकांना विधानसभेत सुनावले. जसे कर्नाटक म्हणतेय, तसेच आपणही इंच इंच लढू. सर्वोच्च न्यायालय असेल किंवा केंद्र सरकार असेल, सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी जे काही करता येईल ते करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.


कर्नाटकविरोधात आपला ठराव आणण्याचे ठरले होते. मागच्या आठवड्यातले वातावरण जरा गंभीर होते. त्यामुळे तो आणता आला नाही. आज तो आणण्याचा निर्णय होता. पण मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून निमंत्रण आले आणि महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांना दिल्लीला जावे लागले. मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीला गेले आहेत, ते दुपारी परणार आहेत. मुख्यमंत्री आज दुपारपर्यंत येतील. शक्य झाल्यास आज संध्याकाळी नाहीतर उद्या आपण हा ठराव निश्चितपणे मांडू. यासंदर्भात तसूभरही महाराष्ट्राचे सरकार मागे हटणार नाही, अशी ग्वाही मी सभागृहाला देतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.


सीमावादाच्या प्रश्नावर सरकार विधिमंडळात ठराव आणणार होते. अद्याप ठराव का आणला नाही? असा सवाल विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. कर्नाटकने ठराव आणला आणि कारण नसताना सीमावाद चिघळला, अशी टीका अजित पवार यांनी केली. परिस्थिती चिघळवायचा प्रयत्न करू नका, असा गंभीर इशारा महाराष्ट्राने दिला पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या विषयावर सभागृह एक आहे. आपल्याला या विषयावर वातावरण बिघडू द्यायचे नाही, आपल्याला एक राहायचे आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या गदारोळावर स्पष्ट केले.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी