मुंबई चिपी विमानसेवेच्या फेऱ्या ३० जानेवारीपासून नियमित धावणार

  80

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश


कणकवली : मुंबई -चिपी विमानसेवा येत्या ३० जानेवारीपासून दररोज सुरू राहणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई उडडाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नामुळे कोकणात जाणाऱ्या विमान प्रवाशांना ही नव्या वर्षात भेट मिळणार आहे.


वाजवी विमान भाडे आणि सिंधुदुर्ग चिपी विमानतळाच्या संदर्भात नारायण राणे यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र पाठवले होते. या पत्रातून सिंधुदुर्ग-मुंबई-सिंधुदुर्ग मार्गासाठी विमान भाडे वाजवी करावे याकडे लक्ष वेधले होते. तसेच या मार्गावरील मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस चालवत आहे आणि ती दररोज सेवा द्यावी याकडे लक्ष राणे यांनी पत्रात नमूद केले होते.


या पत्राची तातडीने दखल घेत प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेवून सिंधिया यांनी मुंबई चिपी विमानसेवा येत्या ३० जानेवारी २०२३ पासून नियमित सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण