कणकवली : मुंबई -चिपी विमानसेवा येत्या ३० जानेवारीपासून दररोज सुरू राहणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई उडडाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नामुळे कोकणात जाणाऱ्या विमान प्रवाशांना ही नव्या वर्षात भेट मिळणार आहे.
वाजवी विमान भाडे आणि सिंधुदुर्ग चिपी विमानतळाच्या संदर्भात नारायण राणे यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र पाठवले होते. या पत्रातून सिंधुदुर्ग-मुंबई-सिंधुदुर्ग मार्गासाठी विमान भाडे वाजवी करावे याकडे लक्ष वेधले होते. तसेच या मार्गावरील मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस चालवत आहे आणि ती दररोज सेवा द्यावी याकडे लक्ष राणे यांनी पत्रात नमूद केले होते.
या पत्राची तातडीने दखल घेत प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेवून सिंधिया यांनी मुंबई चिपी विमानसेवा येत्या ३० जानेवारी २०२३ पासून नियमित सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…