डॉ. आंबेडकर यांच्या जन्माबाबतच्या खोट्या दाव्याने महापुरुषांचा अपमान

भाजप आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांवर घणाघात


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात महापुरुषांबाबत अवमानाचा मुद्दा तापलेला असतानाच खुद्द शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेची झोड उठली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, असे संजय राऊत म्हणाले होते. याबाबत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.


‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे यांना माहीत नाही काय? त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावात झाला. बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झालेला नाही. हा महापुरुषांचा अपमान नाही का? माफी मागा!!!’ असे ट्वीट करत आमदार नितेश राणे यांनी राऊतांना धारेवर धरले आहे.


‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला’, असे संजय राऊत म्हणाले. मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला नसून त्यांच्या जन्म मध्य प्रदेश राज्यातील महू या गावात झाला आहे. त्यामुळे राऊतांनी केलेल्या खोट्या दाव्यामुळे विरोधकांनी राऊतांविरोधात रान उठवले आहे.


आमदार नितेश राणे यांनी एक व्हीडिओ शेयर केला आहे. त्यात संजय राऊत पत्रकारांशी बोलताना दिसत आहेत. पत्रकारांना प्रतिक्रिया देत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला असे राऊत बोलून गेले. याच वक्तव्यावरून राऊतांना धारेवर धरले आहे. कारण संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य साफ चुकीचे आहे. मुळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावात झाला.

Comments
Add Comment

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या

महापौरपदाची सोडत चक्राकार पद्धतीने?

या पध्दतीत खुल्या गटातील महापौराची शक्यता कमी मुंबई : मुंबईच्या महापौरपदासाठी येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण