डॉ. आंबेडकर यांच्या जन्माबाबतच्या खोट्या दाव्याने महापुरुषांचा अपमान

भाजप आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांवर घणाघात


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात महापुरुषांबाबत अवमानाचा मुद्दा तापलेला असतानाच खुद्द शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेची झोड उठली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, असे संजय राऊत म्हणाले होते. याबाबत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.


‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे यांना माहीत नाही काय? त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावात झाला. बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झालेला नाही. हा महापुरुषांचा अपमान नाही का? माफी मागा!!!’ असे ट्वीट करत आमदार नितेश राणे यांनी राऊतांना धारेवर धरले आहे.


‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला’, असे संजय राऊत म्हणाले. मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला नसून त्यांच्या जन्म मध्य प्रदेश राज्यातील महू या गावात झाला आहे. त्यामुळे राऊतांनी केलेल्या खोट्या दाव्यामुळे विरोधकांनी राऊतांविरोधात रान उठवले आहे.


आमदार नितेश राणे यांनी एक व्हीडिओ शेयर केला आहे. त्यात संजय राऊत पत्रकारांशी बोलताना दिसत आहेत. पत्रकारांना प्रतिक्रिया देत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला असे राऊत बोलून गेले. याच वक्तव्यावरून राऊतांना धारेवर धरले आहे. कारण संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य साफ चुकीचे आहे. मुळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावात झाला.

Comments
Add Comment

कबुतरखान्याचा मुद्दा परत तापणार! जैन मुनींनी दिला उपोषणाचा इशारा, आम्ही गिरगावकर संघटनाही आक्रमक

मुंबई: दादर येथील कबुतरखान्याचा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून दादर येथील कबुतरखाना

Exclusive News: मतदार यादीमुळे विरोधकांना कशा प्रकारे झाली मदत; भाजप करणार पर्दाफाश!

'दिल्ली अजून दूर, मी २०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार' - देवेंद्र फडणवीस मुंबई: महाराष्ट्राचे

बाप रे ! 'लाडकी बहीण' योजनेचा १२,४३१ पुरुषांनीच घेतला गैरफायदा; सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश, कोट्यवधींची लूट!

मुंबई: महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे आणि कुटुंबातील त्यांचा निर्णय

दिवसा कडक ऊन, रात्री थंडी! ऑक्टोबर हिटमुळे आरोग्याची काळजी कशी घ्याल?

मुंबई: पावसाळ्यानंतर आता पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हिट'ने जोर धरला आहे. दिवसा कडक उन्हाळा आणि रात्री

एअर इंडियाचे अमेरिकेला निघालेले विमान टेक-ऑफनंतर मुंबईत परतले; तांत्रिक बिघाडाची सात दिवसांतील दुसरी घटना

मुंबई: एअर इंडियाच्या मुंबईहून अमेरिकेतील नेवार्क शहराकडे जाणाऱ्या विमानाला (फ्लाइट AI191) टेक-ऑफनंतर तांत्रिक

खासदार रवींद्र वायकर यांच्या इमारतीला आग; 'फायर सिस्टीम'मधील त्रुटींमुळे वायकर संतापले!

मुंबई: सध्या दिवाळीच्या धामधुमीत फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच एक मोठी आणि