डॉ. आंबेडकर यांच्या जन्माबाबतच्या खोट्या दाव्याने महापुरुषांचा अपमान

  69

भाजप आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांवर घणाघात


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात महापुरुषांबाबत अवमानाचा मुद्दा तापलेला असतानाच खुद्द शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेची झोड उठली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, असे संजय राऊत म्हणाले होते. याबाबत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.


‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे यांना माहीत नाही काय? त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावात झाला. बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झालेला नाही. हा महापुरुषांचा अपमान नाही का? माफी मागा!!!’ असे ट्वीट करत आमदार नितेश राणे यांनी राऊतांना धारेवर धरले आहे.


‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला’, असे संजय राऊत म्हणाले. मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला नसून त्यांच्या जन्म मध्य प्रदेश राज्यातील महू या गावात झाला आहे. त्यामुळे राऊतांनी केलेल्या खोट्या दाव्यामुळे विरोधकांनी राऊतांविरोधात रान उठवले आहे.


आमदार नितेश राणे यांनी एक व्हीडिओ शेयर केला आहे. त्यात संजय राऊत पत्रकारांशी बोलताना दिसत आहेत. पत्रकारांना प्रतिक्रिया देत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला असे राऊत बोलून गेले. याच वक्तव्यावरून राऊतांना धारेवर धरले आहे. कारण संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य साफ चुकीचे आहे. मुळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावात झाला.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र