बारावीची ४ मार्च तर दहावीची परीक्षा १५ मार्च पासून सुरू होणार

  50

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या १०वी आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च रोजी, तर १०वीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे.


गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. परीक्षा रद्द करण्यात आल्या. ऑनलाइन वर्ग करण्यात आले. राज्यात नुकत्याच शाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर १०वी, १२वीच्या बोर्डाच्या परीक्षांचा मुहूर्त ठरला असून, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एका व्हीडिओच्या माध्यमातून घोषणा केली आहे.


गेल्यावर्षी कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. यावर्षी १२वीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल, तर १०वीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी