India China Clash : चीनच्या घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी उधळला

असा झाला तवांगमधील संघर्ष!


गुवाहाटी : अरुणाचल प्रदेमधील तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा चिनी सैनिकांचा डाव (India China Clash) भारतीय जवानांनी उधळून लावला.


चीनच्या घुसखोरीला रोखताना झालेल्या संघर्षात सहा भारतीय जवान जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्यावर गुवाहाटीमधील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवळपास ६०० चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. चिनी सैन्यातही अनेकजण जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. ९ डिसेंबर रोजी ही घटना घडली.


भारत आणि चीनदरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा अद्याप निश्चित नाही. दोन्ही देशांदरम्यान ३००० किमीची प्रत्यक्ष ताबा रेषा आहे. ९ डिसेंबर रोजी मध्यरात्री सुमारे ६०० चिनी सैन्याने ओढा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली. या दरम्यान, हाणामारीचा आवाज, गोंधळ ऐकू आल्यानंतर तातडीने ७० ते ८० जवानांना पाठवण्यात आले. भारत आणि चीनच्या सैन्यात काही तास हाणामारी सुरू होती. या संघर्षात एकही गोळी झाडली गेली नाही. मात्र, लाठी-काठी, दगडांचा वापर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. चीनने ज्या ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न केला, तो भाग समुद्रसपाटीपासून १४ ते १७ हजार फूट उंच आहे. चीनकडून याआधीदेखील घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र, भारतीय सैन्याने हा डाव उधळून लावला होता. त्यामुळे चिनी सैन्याने रात्रीची वेळ निवडली. मात्र, सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने चिनी सैन्याचा मध्यरात्रीचा घुसखोरीचा डाव उधळून लावला.


भारतीय सैन्यातील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्य घुसखोरीसाठी सज्ज होते. ज्या ठिकाणी संघर्ष झाला, त्या ठिकाणी घनदाट जंगल आहे. चीन आपल्या बाजूने पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांपूर्वी या भागात बर्फवृष्टी झाली. त्याशिवाय, ढग दाटून आले होते. त्यामुळे भारतीय सॅटेलाइट्सला चिनी सैन्याच्या हालचाली टिपण्यास अडथळे येत होते. त्यानंतर भारतीय सैन्याने रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल जिओलोकेशन इक्पिमेंटचा वापर करून सॅटेलाइट इमेज घेतल्या आहेत.


याआधी १५ जून २०२० रोजी, गलवानमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यावेळी भारताच्या २० जवानांनी प्राणाचे बलिदान दिले होते. यापूर्वी १९६७ मध्येही दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. १९६७ मध्ये नाथुला येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे ८८ सैनिक हुतात्मा झाले होते. तर, चीनकडून ३०० हून अधिक सैनिक ठार झाले होते.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला