बोगोटा (वृत्तसंस्था) : भारताची स्टार खेळाडू मीराबाई चानूने कोलंबियामध्ये सुरू असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये (World Weightlifting Championships) रौप्य पदक जिंकण्याची कामगिरी केली.
चानूने ४९ किलो वजनी गटात २०० किलो वजन उचलून दुसरे स्थान पटकावले. तिला स्नॅचमध्ये केवळ ८७ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो वजन उचलता आले. चीनच्या जियांग हुइहुआने २०६ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.
भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू मनगटाच्या दुखापतीमुळे जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकापासून दूर राहिली आहे. २८ वर्षीय मीराबाई चानूने एकूण २०० किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले आहे. दरम्यान, चीनच्या जियांग हुआहुआने २०६ किलो वजन उचलून जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णभरारी घेतली आहे.
नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकणारी स्टार भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूसाठी हे पदक मिळवणे तसे सोपे नव्हते. मीराबाईने सुरुवातीच्या स्नॅचमध्ये ८५ किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात ८७ किलो वजन उचलले. यानंतरच्या प्रयत्नात मात्र मीराबाई चानूने ११३ किलो वजन उचलून जियांग हुआहुआशी बरोबरी साधली.
मीराबाईच्या विजयानंतर तिचे प्रशिक्षक विजय शर्मा म्हणाले की, “या स्पर्धेसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे दडपण घेतले नव्हते. हेच वजन मीरा नेहमी सरावादरम्यान उचलते. पण आता आम्ही वाढलेल्या वजनाने सराव करणार आहोत. सप्टेंबरमध्ये प्रशिक्षण सत्रादरम्यान मीराबाई चानूच्या मनगटाला दुखापत झाली होती. तिने दुखापतीसह राष्ट्रीय खेळांमध्येही भाग घेतला होता आणि इथेही ती पूर्णपणे तंदुरुस्त नव्हती.
चानूने २०१७ मध्ये जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…