Air pollution : धुके नव्हे धुलीकण; मुंबईतील हवेतील स्तर ‘वाईटच’

  70

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील धुसर वातावरण (Air pollution) क्षणभर प्रत्येकाला धुक्यांचा भास देऊन जाणारे ठरत आहे. मात्र, हे धुके नव्हे तर धुली कण असल्याने मुंबईच्या हवामानावर ते परिणाम करणारे ठरत आहेत. मुंबईत गेल्या आठवडाभरापासून हवेतील स्तर ढासळत असून अद्यापही सुधारणा झालेली नाही. तर सकाळी मुंबईत अनेक ठिकाणी धुकेसदृश्य वातावरण दिसून येते मात्र ते धुके नसून धुली कण आहेत. यामुळे सध्या सर्दी खोकला घसा दुखण्याचे प्रमाणही मुंबईत वाढले आहेत.


दरम्यान मुंबईत २९३ एक्यूआय सह हवेचा स्तर ‘वाईट’ नोंदवला गेला आहे. तर मुंबईतील कुलाबा, मालाड, माझगाव, बीकेसी, अंधेरी भागातील हवेची स्थिती अत्यंत खराब असून या परिसरात ‘अतिशय वाईट’ हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला आहे.


यात माझगाव येथे हवेचा स्तर सर्वाधिक खराब आहे. येथे ३८१ एक्यूआयची नोंद झाली आहे. त्यानंतर मालाड येथे ३२३, कुलाबा ३०९, बीकेसी ३०९ आणि अंधेरी ३०३ एक्यूआय ची नोंद झाली. सध्या हवेचा स्तर खराब झाल्यामुळे हे सर्व परिसर ‘रेड झोन’ मध्ये आहेत. तर वरळी आणि बोरिवली येथे १९० आणि १७३ हवेचा स्तर नोंदवला असून हा स्तर मध्यम आहे. तर दुसरीकडे मुंबईत सकाळी धुके पसरलेले असतात मात्र हे धुके नाही, तर प्रदूषणामुळे असलेले धुळीचे कण आहेत. यामुळे वातावरण देखील धुसर दिसत आहे.


डिसेंबर महिना आणि थंडी असे एकंदरीत गणित दिसून येते. त्यामुळे धुक्याचा आभास निर्माण करणारे धुलीकण हे मानवी आरोग्यास तसे हानिकारकच आहेत. वातावरणातील हा बदल डोकेदुखी, सर्दी-खोकला, घसा दुखी वाढविणारी ठरत आहे.

Comments
Add Comment

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर

सार्वजनिक वाहनांमध्ये बसवणार पॅनिक बटण, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): सार्वजनिक प्रवासी वाहनांमधील महिलांच्या सुरक्षेचा मु्द्दा ऐरणीवर आला होता. सार्वजनिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे