measles : दिवसभरात गोवरच्या ८ नवीन रुग्णांची नोंद; ७१ संशयित रुग्ण

  53

मुंबई (वार्ताहर) : मुंबईतील वाढत्या गोवरच्या (measles) रुग्णसंख्येमुळे पालिकेची चिंता वाढली आहे. मंगळवारी दिवसभरात ८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात गोवर बाधित रुग्णांची संख्या ४२० वर पोहोचली आहे. दिवसभरात ७१ संशयित रुग्णांची नोंद झाल्याने संशयित रुग्णांची संख्या ४,६५८ वर पोहचली आहे.


मुंबईत गोवरचा विळखा दिवसेंदिवस आवळत असून झोपडपट्टी भागांत गोवरचा उद्रेक झाला आहे. भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, अंधेरी पूर्व, कुर्ला, भांडुप, मालाड, चेंबूर, गोवंडी, दहिसर हे गोवरचे हॉटस्पॉट ठरले आहेत. मंगळवारी दिवसभरात ७१ संशयीत रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात २८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ४० रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. आतापर्यंत ७० लाख २२ हजार ३६५ घरांचे सर्वेक्षण झाले आहे.


कानपूर येथून आलेला मुलगा संशयित


दादर चैत्यभूमी येथे कानपूर येथून आलेल्या मुलाची रविवारी पालिका अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याला गोवरचा संसर्ग असल्याचा संशय आला होता. त्यामुळे त्या मुलाला कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता कुटुंबियांनी मुलास दाखल करण्यास नकार दिला. त्या मुलावर ओपीडीत उपचार केल्यानंतर कुटुंबियांनी मुलास पुन्हा कानपूरला नेल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.


गोवरचा वाढता धोका लक्षात घेता चैत्यभूमी येथे पालिकेच्या जी उत्तर विभागाने आरोग्य तपासणीचे विशेष कॅम्प आयोजित केले होते. ३ ते ६ डिसेंबरपर्यंत ७,२१३ तपासण्या केल्या. आयोजित आरोग्य कॅम्पमध्ये तीन शिफ्टमध्ये आरोग्य कर्मचारी कार्यरत असून एका शिफ्टमध्ये १५० कर्मचारी कार्यरत आहेत. तर २५ रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्याचे जी उत्तर विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विरेंद्र मोहिते यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Assembly Session : एसटीची दुरावस्था ते ड्रग्ज तस्करी; अधिवेशनात आज ‘या’ मुद्द्यांवरून होणार खडाजंगी

विधान परिषदेत गाजणार 'हे' महत्वाचे मुद्दे  मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज गाजणार आहे. एक

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या