मुंबईत २ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू

Share

मुंबई : मुंबईत २ जानेवारीपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून हा जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची निदर्शने, घोषणाबाजी आणि कार्यक्रम करण्यास मनाईदेखील असणार आहे. तसेच २ जानेवारीपर्यंत शहरात शस्त्रबंदी देखील लागू करण्यात आली आहे.

पोलिसांनी २ जानेवारीपर्यंत मुंबई शहरात कलम १४४ लागू केले आहे. या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास परवानगी नाही. याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

४ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत पोलीस सतर्क

मुंबईत कलम १४४ लागू करण्याची अचानक घोषणा करण्यात आली आहे. मुंबई शहरात शांतता राहावी आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी ४ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत शहरात कलम १४४ लागू केले आहे.

यादरम्यान एकाच ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासही बंदी घालण्यात आली. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ४ डिसेंबर २०२२ ते २ जानेवारी २०२३ या कालावधीत शहरात शस्त्रे, फायर आर्म्स, तलवारी आणि इतर शस्त्रे बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर यावेळी घोषणाबाजी, निदर्शने आणि सार्वजनिक ठिकाणी गाणी सादर करण्यासही बंदी घातली आहे. तसेच लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड वाजवण्यास आणि फटाके फोडण्यास मनाई असेल. सहकारी संस्था आणि इतर संघटनांच्या सभा घेण्यास मनाई नाही. सरकारी कार्यालये, न्यायालये आणि सरकारी किंवा निमशासकीय काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आसपास ५ किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago