कणकवलीत तीन ग्रामपंचायती भाजपकडे बिनविरोध

आमदार नितेश राणे यांच्या गाव विकासाच्या संकल्पनेला जनतेचा पाठिंबा


कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने यशस्वी घोडदौड सुरू केली आहे. आमदार नितेश राणे यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील शिडवणे आणि वायंगणी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध भाजपकडे आल्या आहेत.


शिडवणे ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपचे जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आले आहेत. त्यांना गावातून भाजपचा सरपंच म्हणून बिनविरोध निवडून दिले आहे तर वायगणी सरपंच पदी भाजपच्या अस्मी लाड या बिनविरोध निवडून आल्या आहेत.


तर ओझरम सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या समृद्धी राणे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांनाही गावातील जनतेने भाजपचा सरपंच म्हणून बिनविरोध निवडून दिले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने विजयी सलामी दिली आहे.


शिडवणे येथील ग्रामपंचायत वर सरपंच म्हणून रवींद्र शेट्ये हे बिनविरोध निवडून आले. तर तर प्रभाग एक मधून कोमल कृष्णा शेटये, दीपक जीवबा पाटणकर, प्रभाग दोन मधून दयानंद दिनकर कुडतरकर, शांताराम यशवंत धुमाळ, सुप्रिया पांचाळ, प्रभाग तीन मधून राजश्री गोकुळ शिरसेकर, स्मिता मनोहर टक्के, सुप्रिया योगेश पाष्टे, यांची बिनविरोध निवड झाली आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे हे सर्व उमेदवार विरोधी उमेदवार नसल्यामुळे बिनविरोध निवडून आले आहेत.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात