साईदर्शन हेच औषध

Share

साईबाबा अनेक भक्तांना व्याधिमुक्त करीत असत. एकदा श्रीमंत बापूसाहेब बुट्टी यांनाही काही कारणाने पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्याची परिणती म्हणून त्यांना वरचेवर जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. त्यांनीही पुष्कळ उपचार केले. पण एकही लागू पडला नाही. त्यामुळे ते इतके अशक्त झाले की, त्यांच्या बाबांच्या नित्य दर्शनातही खंड पडू लागला. ही गोष्ट बाबांना समजली तेव्हा बाबांनी त्यांना मशिदीत बोलावून घेतले आणि आपल्या सन्मुख बसवून म्हणाले, आता उलटी केलीत वा शौचाला गेलात तर खबरदार! माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा. बाबांचे हे शब्द बापूसाहेबांना उद्देशून नसून त्यांच्या व्याधींना होते आणि त्या शब्दांचा दरारा तर पाहा! ज्याक्षणी बाबांचा शब्द निघाला त्या क्षणी व्याधींनी पोबारा केला आणि बापूसाहेबांना त्वरित आराम पडला.

एकदा आळंदीचे एक स्वामी बाबांच्या दर्शनासाठी शिरडीत आले. त्यांना कर्करोग होता. त्यामुळे त्यांचा कान इतका ठणकायचा की, त्यांना झोपही यायची नाही आणि त्यांच्या कानाला सूजही येत असे. त्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी अनेक उपचार केले, पण उपयोग झाला नाही. मुंबईच्या डॉक्टरांनी त्यांना शस्त्रिक्रिया करवून घेण्याचा सल्ला दिला होता. ते जेव्हा बाबांच्या दर्शनास गेले तेव्हा माधवराव देशपांडे यांनी बाबांना त्यांचा कान बरा करण्याची विनंती केली तेव्हा बाबांनी अल्ला अच्छा करेगा, असे म्हणून काही देशी उपाय सांगितले. स्वामी पुण्याला परतल्यावर साधारणतः आठ दिवसांनी त्यांचे पत्र आले. त्यांनी लिहिले होते, बाबांच्या आशीर्वादाने ठणका तत्क्षणीच थांबला. थोडीबहुत सूज होती म्हणून मी मुंबईच्या डॉक्टरांकडे गेलो, तर तोपर्यंत सूजही उतरली. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची गरज नाही, असे सांगितले.

-विलास खानोलकर

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

5 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

5 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

6 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

6 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

7 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

7 hours ago