Bhagat Singh Koshyari : भारत-रशियातील सांस्कृतिक संबंध शेकडो वर्षे जुने

मुंबई (वार्ताहर) : भारत व रशिया राजनैतिक संबंध स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली असली तरीही उभय देशांमधील सांस्कृतिक व व्यापार संबंध शेकडो वर्षे जुने आहेत. रामचरित मानस व ज्ञानेश्वरी प्रमाणेच रशियन लेखक मॅक्सिम गॉर्की, लिओ टॉल्स्टॉय, अँटन चेकॉव्ह यांचे साहित्य सर्वकालीन श्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी येथे केले.


रशिया - भारत राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील रॉयल ऑपेरा हाऊस येथे सोमवारी रशियन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रशियातील ५० कोसॅक कलाकारांच्या चमूने 'क्रिनित्सा' हे संगीत, लोककला व युद्धकला यावर आधारित नृत्य सादर केले.


भारत व रशियात आज अतिशय घनिष्ठ राजकीय व राजनैतिक संबंध आहेत. सांस्कृतिक संबंध वाढल्यास हे संबंध आणखी दृढ होतील, असे मत राज्यपालांनी मांडले. पूर्वी जसे अभिनेते राज कपूर रशियात प्रसिद्ध होते तसेच आज भारतीय योग तेथे लोकप्रिय असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. रशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत अलेक्सी सुरोवत्सेव यांनी आपले स्वागत भाषण संपूर्ण हिंदीत केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले.


यावेळी राज्यपालांनी 'क्रिनित्सा' संगीत नृत्याचे दिग्दर्शक तसेच सर्व सहभागी कलाकारांची भेट घेऊन त्यांना कौतुकाची थाप दिली. कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, रशियाचे मुंबईतील उप वाणिज्यदूत जॉर्जी ड्रीअर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे पश्चिम विभागीय अधिकारी अनुराग सिंह, रॉयल ऑपेरा हाऊसचे संचालक आशिष दोशी व निमंत्रित उपस्थित होते.


भारतातील रशियन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन रशियाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने मुंबईतील रशियन वाणिज्य दूतावास, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद पश्चिम विभाग व रॉयल ऑपेरा हाऊस यांच्या सहकार्याने केले होते. महोत्सवानिमित्त दिल्ली व कोलकाता येथे देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे वाणिज्यदूतांनी सांगितले.

Comments
Add Comment

महसूलमंत्र्यांच्या आश्वासनानंतर महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन स्थगित

मुंबई : महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाने आपल्या प्रलंबित आर्थिक आणि सेवाविषयक

रेशन कार्डधारकांसाठी नवे नियम व अटी लागू; अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईची तयारी

मुंबई : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने ठोस पावले

वरळी सी लिंक वर २५० च्या स्पीडने पळवली लंबोर्गिनी; पोलिसांनी घडवली अद्दल

मुंबई : मुंबईतील वांद्रे–वरळी सी लिंकवर भरधाव वेगात आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने लॅम्बोर्गिनी उरूस चालवण्याचा

Pradnya Satav : 'राजीवभाऊंचे आशीर्वाद अन् देवाभाऊंची साथ'; प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं भरभरून कौतुक

मुंबई : गेल्या २४ तासांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या डॉ. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावर अखेर

Navnath Ban : 'संजय राऊत स्वतःला पक्षप्रमुख समजू लागलेत का?' भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघाती हल्ला

मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार : नवनाथ बन मुंबई : शिवसेना (उबाठा) गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या

Pradnya Satav : अखेर प्रज्ञा सातव यांनी हाती घेतलं कमळ! चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये पक्षप्रवेश

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना आज वेग आला असून, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ.