Lumpy skin disease virus : रत्नागिरीत लम्पी झालेल्या ७८ पैकी १२ गुरांचा मृत्यू

रत्नागिरी (प्रतिनिधी) : सध्या देशात तसेच राज्यातही लम्पी स्कीन (Lumpy skin disease virus) या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येत आहे. या आजाराने जिल्हाभरात आतापर्यंत एकूण ७८ गुरांना या आजाराची बाधा झाली असून त्यामध्ये एकूण १२ गुरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.


लम्पी स्कीन रोग हा विषाणूजन्य त्वचारोग असून त्याचा प्रादुर्भाव पशुंना होतो. प्रामुख्याने हा आजार गायी, म्हशींमध्ये आढळत आहे. जिह्यातील लम्पी स्किन आजाराची लागण जनावरांमध्ये दिसून येत आहे. लम्पी रोगाचा फैलाव दिवसागणिक वाढत चालल्याने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विकास विभाग सतर्क झाला आहे. लसीकरणाच्या मोहिमेवर भर देण्यात आला आहे.


दरम्यान, लम्पी प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाभरात पशुसंवर्धन विभागामार्पत जनावरांना लसीकरणाविषयी जनजागृती केली जात आहे. तसेच जनावरांवर फवारणीचे नियोजनही करण्यात येत आहे.


जिल्ह्वयात आतापर्यत एकूण ७८ गुरांना लम्पी आजाराची लागण झालेली आहे. त्यापैकी १२ गुरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मागील जनगणनेनुसार एकूण २ लाख ३५ हजार इतके पशुपालकांकडे पशुधन आहे. त्यापैकी आतापर्यंत आढळून आलेल्या लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर त्या गावांतील २ लाख गुरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. जिल्ह्यातील पशुपालकांनी गोठ्यांची स्वच्छता, तसेच आजारी गुरांविषयी योग्य ती खबरदारी घ्यावी. या आजाराच्या प्रतिबंधासाठी तातडीने पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.अभिजीत कसालकर यांनी केले आहे.


रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी, ढोकमळे, नेवरे, सडये येथील पशुपालकांची ४ गुरे बाधित आढळून आली. त्यापैकी २ गुरे मृत झालेली आहेत. त्यामुळे या खबरदारी घ्यावी असे आवाहन जि.प.पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ.अभिजीत कसालकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

समृद्ध पंचायतराज अभियानातून राज्यात सर्वाधिक बक्षिसे मतदार संघाने मिळवावीत: ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम

समृद्ध पंचायतराज अभियानासाठी विशेष प्रयत्न करा दापोली: ग्रामविकास व पंचायतीराज विभागामार्फत राबविण्यात

भक्ती मयेकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट: आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांचीही चौकशी, बारमधून महत्त्वाचा पुरावा जप्त

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. मुख्य

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षण भिंत कोसळल्याने गणेशोत्सवात सीएनजीचा पुरवठा बंद; वाहनचालकांची धावपळ

मंडणगड: गणेशोत्सवादरम्यान मंडणगडमधील एकमेव सीएनजी पंप बंद झाल्याने स्थानिक वाहनचालक आणि गणेशभक्तांची मोठी