रत्नागिरी (प्रतिनिधी) : सध्या देशात तसेच राज्यातही लम्पी स्कीन (Lumpy skin disease virus) या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येत आहे. या आजाराने जिल्हाभरात आतापर्यंत एकूण ७८ गुरांना या आजाराची बाधा झाली असून त्यामध्ये एकूण १२ गुरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.
लम्पी स्कीन रोग हा विषाणूजन्य त्वचारोग असून त्याचा प्रादुर्भाव पशुंना होतो. प्रामुख्याने हा आजार गायी, म्हशींमध्ये आढळत आहे. जिह्यातील लम्पी स्किन आजाराची लागण जनावरांमध्ये दिसून येत आहे. लम्पी रोगाचा फैलाव दिवसागणिक वाढत चालल्याने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विकास विभाग सतर्क झाला आहे. लसीकरणाच्या मोहिमेवर भर देण्यात आला आहे.
दरम्यान, लम्पी प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाभरात पशुसंवर्धन विभागामार्पत जनावरांना लसीकरणाविषयी जनजागृती केली जात आहे. तसेच जनावरांवर फवारणीचे नियोजनही करण्यात येत आहे.
जिल्ह्वयात आतापर्यत एकूण ७८ गुरांना लम्पी आजाराची लागण झालेली आहे. त्यापैकी १२ गुरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मागील जनगणनेनुसार एकूण २ लाख ३५ हजार इतके पशुपालकांकडे पशुधन आहे. त्यापैकी आतापर्यंत आढळून आलेल्या लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर त्या गावांतील २ लाख गुरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. जिल्ह्यातील पशुपालकांनी गोठ्यांची स्वच्छता, तसेच आजारी गुरांविषयी योग्य ती खबरदारी घ्यावी. या आजाराच्या प्रतिबंधासाठी तातडीने पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.अभिजीत कसालकर यांनी केले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी, ढोकमळे, नेवरे, सडये येथील पशुपालकांची ४ गुरे बाधित आढळून आली. त्यापैकी २ गुरे मृत झालेली आहेत. त्यामुळे या खबरदारी घ्यावी असे आवाहन जि.प.पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ.अभिजीत कसालकर यांनी सांगितले.
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या…
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…