Chandrashekhar Bavankule : लांजा तालुक्यात भाजपा शतप्रतिशत करा - बावनकुळे

लांजा (प्रतिनिधी) : आगामी काळात संपूर्ण लांजा तालुका हा भाजपामय झाला पाहिजे. यासाठी लागेल तो निधी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल, असे ठोस आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी लांजा येथे दिले.


रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शुक्रवारी सायंकाळी लांजा येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शहरातील संकल्प सिद्धी सभागृहात पार पडलेल्या या भाजपा मेळाव्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नेत्या चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन तसेच अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, शैलेंद्र दळवी, तालुकाप्रमुख महेश खामकर आदी मान्यवर उपस्थित होते.


उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री.बावनकुळे यांनी सांगितले की, आगामी काळात संपूर्ण लांजा तालुका हा शतप्रतिशत भाजपामय झाला पाहिजे. यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या लोक कल्याणकारी योजना या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करा. यासाठी तालुक्याच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी येथील पदाधिकाऱ्यांना दिले.


सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे लांजा तालुकाध्यक्ष महेश खामकर व पदाधिकारी यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपाचे शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, तालुका प्रभारी वसंत घडशी, नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे तसेच हेमंत शेट्ये, ओबीसी सेलचे दादा भिडे, अशोक गुरव, बाबा राणे, विशू जेधे, रवींद्र कांबळे, तालुका सरचिटणीस विराज हरमले आदींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला कोकणाच्या सौंदर्याची भूरळ! विजय देवरकोंडाच्या आगामी चित्रपटाचे रत्नागिरीमध्ये शुटींग सुरू

रत्नागिरी: कोकणातील डोंगररांगा, बारमाही वाहणाऱ्या नद्या, स्थापत्य, संस्कृती यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्याची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

रत्नागिरीत धक्कादायक घटना, एसटी बसचा आपत्कालीन दरवाजा उघडल्याने महिलेचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर-गणेशखिंड मार्गावर घडलेल्या एका अपघातात एसटी बसचा आपत्कालीन दरवाजा

कोकणातील राजकारणातून महत्त्वाची बातमी ! उबाठा गटाचा नेता भाजपच्या वाटेवर, सामंतांचा गौप्यस्फोट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटातील नेता भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग

“कोकण हा शिवसेनेचा श्वास, शिवसेना कोकणी माणसाचा विश्वास” - एकनाथ शिंदे

रत्नागिरी : रत्नागिरीतील शिवसैनिकांचा उत्साह पाहून महायुतीचा भगवा जिल्हा परिषदेवर फडकणारच, ही काळ्या दगडावरची