Chandrashekhar Bavankule : लांजा तालुक्यात भाजपा शतप्रतिशत करा - बावनकुळे

लांजा (प्रतिनिधी) : आगामी काळात संपूर्ण लांजा तालुका हा भाजपामय झाला पाहिजे. यासाठी लागेल तो निधी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल, असे ठोस आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी लांजा येथे दिले.


रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शुक्रवारी सायंकाळी लांजा येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शहरातील संकल्प सिद्धी सभागृहात पार पडलेल्या या भाजपा मेळाव्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नेत्या चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन तसेच अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, शैलेंद्र दळवी, तालुकाप्रमुख महेश खामकर आदी मान्यवर उपस्थित होते.


उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री.बावनकुळे यांनी सांगितले की, आगामी काळात संपूर्ण लांजा तालुका हा शतप्रतिशत भाजपामय झाला पाहिजे. यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या लोक कल्याणकारी योजना या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करा. यासाठी तालुक्याच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी येथील पदाधिकाऱ्यांना दिले.


सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे लांजा तालुकाध्यक्ष महेश खामकर व पदाधिकारी यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपाचे शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, तालुका प्रभारी वसंत घडशी, नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे तसेच हेमंत शेट्ये, ओबीसी सेलचे दादा भिडे, अशोक गुरव, बाबा राणे, विशू जेधे, रवींद्र कांबळे, तालुका सरचिटणीस विराज हरमले आदींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

समृद्ध पंचायतराज अभियानातून राज्यात सर्वाधिक बक्षिसे मतदार संघाने मिळवावीत: ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम

समृद्ध पंचायतराज अभियानासाठी विशेष प्रयत्न करा दापोली: ग्रामविकास व पंचायतीराज विभागामार्फत राबविण्यात

भक्ती मयेकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट: आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांचीही चौकशी, बारमधून महत्त्वाचा पुरावा जप्त

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. मुख्य

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षण भिंत कोसळल्याने गणेशोत्सवात सीएनजीचा पुरवठा बंद; वाहनचालकांची धावपळ

मंडणगड: गणेशोत्सवादरम्यान मंडणगडमधील एकमेव सीएनजी पंप बंद झाल्याने स्थानिक वाहनचालक आणि गणेशभक्तांची मोठी