finance : पंधराव्या वित्तमधून रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले १०० कोटी

रत्नागिरी (प्रतिनिधी) : पंधराव्या वित्त (finance) आयोगांतर्गत २०२२- २३ या आर्थिक वर्षांसाठी पहिला हप्ता जाहीर झाला असून रत्नागिरी जिल्ह्यातील ७९१ ग्रामपंचायतींसाठी १४ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत दीड वर्षात १०० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मिळाल्याने ग्रामविकासाला चालना मिळणार आहे.


ग्रामविकास विभागाकडून विकास कामांसाठी बंधित आणि अबंधित म्हणून ग्रामपंचायतींना ८० टक्के, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी १०-१० टक्के निधीची तरतूद केली जाते. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थांना सन २०२२-२३ चा अबंधित निधी वितरीत केला जात आहे. त्यासाठी ७२६.४१ कोटींचा निधी लागणार आहे.


१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाकडून राज्य शासनास आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ७९१ ग्रामपंचायतींनाही १४ कोटी ८८ लाख इतका निधी मिळणार आहे. सर्वाधिक २ कोटी ५६ लाखांचा निधी हा रत्नागिरी तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींना मिळणार आहे. तर सर्वात कमी निधी मंडणगडमधील ४७ ग्रामपंचायतींना ६५ लाख इतका प्राप्त होणार आहे. या निधीतून गावातील मूलभूत विकास कामांसाठी खर्च करता येणार आहे. गतवर्षी बंधितच्या पहिल्या टप्प्यात १९ कोटी ३२ लाख, तर दुसऱ्या टप्प्यात १९ कोटी १५ लाख रुपयांचा तसेच अबंधितचा पहिल्या २४ कोटी ९८ लाख तर दुसऱ्या टप्प्यात २३ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.


यामुळे दीड वर्षात १०० कोटी पेक्षा जास्त निधी जिल्ह्याला मिळाला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी पी. डी. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई हे सर्व गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना खर्चाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात लवकरच ही रक्कम वर्ग होणार असून आराखड्यानुसार कामेही मार्गी लागणार असल्याने गावविकासालाही चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

महायुतीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जाणार

ना. उदय सामंत यांची घोषणा महायुतीचा अखेर सस्पेन्स संपला नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांची

महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे : मंत्री नितेश राणे

रत्नागिरी : महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून

महिलांच्या सक्षमीकरणातच हिंदू राष्ट्राचे सक्षमीकरण : मंत्री नितेश राणे

गणेशगुळे येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शिलालेखाचे अनावरण राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका

शासकीय कामकाजात 'पेंडिंग' शब्दच नको!

जनतेच्या कामाचा तत्काळ निपटारा करा : खासदार नारायण राणे रत्नागिरी : अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला कोकणाच्या सौंदर्याची भूरळ! विजय देवरकोंडाच्या आगामी चित्रपटाचे रत्नागिरीमध्ये शुटींग सुरू

रत्नागिरी: कोकणातील डोंगररांगा, बारमाही वाहणाऱ्या नद्या, स्थापत्य, संस्कृती यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्याची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार