finance : पंधराव्या वित्तमधून रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले १०० कोटी

  88

रत्नागिरी (प्रतिनिधी) : पंधराव्या वित्त (finance) आयोगांतर्गत २०२२- २३ या आर्थिक वर्षांसाठी पहिला हप्ता जाहीर झाला असून रत्नागिरी जिल्ह्यातील ७९१ ग्रामपंचायतींसाठी १४ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत दीड वर्षात १०० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मिळाल्याने ग्रामविकासाला चालना मिळणार आहे.


ग्रामविकास विभागाकडून विकास कामांसाठी बंधित आणि अबंधित म्हणून ग्रामपंचायतींना ८० टक्के, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी १०-१० टक्के निधीची तरतूद केली जाते. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थांना सन २०२२-२३ चा अबंधित निधी वितरीत केला जात आहे. त्यासाठी ७२६.४१ कोटींचा निधी लागणार आहे.


१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाकडून राज्य शासनास आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ७९१ ग्रामपंचायतींनाही १४ कोटी ८८ लाख इतका निधी मिळणार आहे. सर्वाधिक २ कोटी ५६ लाखांचा निधी हा रत्नागिरी तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींना मिळणार आहे. तर सर्वात कमी निधी मंडणगडमधील ४७ ग्रामपंचायतींना ६५ लाख इतका प्राप्त होणार आहे. या निधीतून गावातील मूलभूत विकास कामांसाठी खर्च करता येणार आहे. गतवर्षी बंधितच्या पहिल्या टप्प्यात १९ कोटी ३२ लाख, तर दुसऱ्या टप्प्यात १९ कोटी १५ लाख रुपयांचा तसेच अबंधितचा पहिल्या २४ कोटी ९८ लाख तर दुसऱ्या टप्प्यात २३ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.


यामुळे दीड वर्षात १०० कोटी पेक्षा जास्त निधी जिल्ह्याला मिळाला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी पी. डी. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई हे सर्व गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना खर्चाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात लवकरच ही रक्कम वर्ग होणार असून आराखड्यानुसार कामेही मार्गी लागणार असल्याने गावविकासालाही चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

कोकणात मुसळधार, राजापूर-चिपळूणमध्ये हाहाकार!

मंदिर - घरांमध्ये पाणी शिरले तर रस्ते व पुलांची दुर्दशा रत्नागिरी : जिल्हयात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच

रत्नागिरी : तब्बल ३७ वर्षांनी आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुराचे पाणी!

रत्नागिरी : राजापुर तालुक्यात काल रात्रीपासून पावसाचा कहर झाला आहे. श्रीक्षेत्र आडिवरे येथील श्री महाकाली

शॉक लागल्यामुळे १३ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथे शॉक लागून १३ वर्षांच्या स्वरांगी गिजमचा तडफडून मृत्यू झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण

आगामी स्थािनक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा

आमदार निलेश राणे यांचे आवाहन चिपळूण : कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण यांच वेगळं नातं आहे, ते कधीच तुटू शकत नाही.