बाबांची अगाध लीला…

Share

मी टॅक्सी ड्रायव्हर असून प. पू. राऊळ महाराजांना मी रत्नागिरी ते कुडाळ येथे नेण्याचे काम करीत होतो. त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे मला त्यांचे अनेक चमत्कार दिसून आले. त्यापैकी काही चमत्कार म्हणा किंवा महाराजांची अगाध दैवी शक्ती म्हणा, त्याची प्रचिती आली. एकदा रत्नागिरी येथील एक प्रसिद्ध उद्योगपतींनी मला सांगितले की, ‘पिंगुळीचे प्रसिद्ध संत श्री राऊळबाबा रत्नागिरीत आलेले आहेत. त्यांना घरी बोलावून आण’. त्यावेळी मी त्यांना विचारले, बाबा आता कुठे मुक्कामाला आहेत तेवढे सांग; परंतु बाबा त्याच हॉटेलात बसले होते.

पण मी अगोदर त्यांना पाहिलेले नसल्यामुळे आबा पेडणेकर यांनीच मला महाराजांबद्दल सांगितले व महाराजांची ओळख करून दिली. मी त्यावेळी त्यांच्या पाया पडले. त्यांचा अवतार पाहता, ते साधेसुधे होते. त्यांच्या अंगावर धड कपडा नाही, भगवी वस्त्रे नाहीत किंवा दाढी पण वाढलेली नव्हती. बाबांच्या पाया पडल्यानंतर त्यांनी मला पेढा दिला. तो घेऊन मी बाहेर आलो. तेव्हा आबा पेडणेकरने सांगितले की, बाबांना घेऊन कुडाळला जा व त्यांना सोडून ये. पण माझी गाडी एवढे अंतर जाऊन येण्याच्या अपेक्षेबाहेर होती. त्याशिवाय त्यावेळी रत्नागिरीत पेट्रोलची पण टंचाई होती. त्यामुळे मी बाबाना घेऊन जाण्यास असमर्थता दर्शविली; परंतु आबा पेडणेकरनी मला सांगितले, तू काहीच काळजी करू नकोस. तुझी व तुझ्या गाडीची काळजी बाबानांच आहे. तू कुडाळला जाऊन ये.

त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी महाराजांना घेऊन कुडाळला गेलो व त्यांना तिथे पोहोचवून परत पण आलो; परंतु गाडीने कसलीही कुरकुर केली नाही किंवा गाडीतील पेट्रोल पण एक थेंबही खर्च झाले नाही. मी गाडी घेऊन जाताना जेवढे पेट्रोल होते तेवढेच एवढा प्रवास करूनसुद्धा होते. म्हणजेच हा चमत्कार राऊळ महाराजांशिवाय कोण करणार?

त्याचप्रमाणे मी एकदा रत्नागिरी येथील एका प्रसिद्ध कारखान्याच्या मालकास घेऊन देवगड येथे जात होतो. वाटेत कोंड्ये येथे महाराजांची गाडी बंद पडली होती व महाराज एका झाडाखाली बसून भजन करीत होते. मी खाली उतरून महाराजांच्या पाया पडलो. त्यावेळी मी त्यांना विचारले की, आपण कुठे चालला आहात? महाराज उत्तरले. ‘आम्ही मुंबईला जात आहोत. पण गाडी बंद पडल्यामुळे येथेच अडकून पडलो आहोत. तेव्हा पोरा तू तरी बघ आमची गाडी चालू होते काय ? मी गाडीजवळ जाऊन क्षुल्लक दुरुस्ती केली व लवकरच गाडी पण चालू झाली. खरोखरच बाबांची लीला अगाध आहे.

-समर्थ राऊळ महाराज

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

5 minutes ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

29 minutes ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

1 hour ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

2 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

2 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

3 hours ago