Thackeray : ठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली : धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे (Thackeray) यांनी दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. हायकोर्टाने निवडणूक आयोगाला या प्रकरणी तातडीने अंतिम आदेश घेण्याचा आदेश दिला आहे.


न्या. संजीव नरुला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी घेण्यात आली. यावेळी उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला या वादाचा शक्य तितक्या लवकर निवाडा करण्याचे निर्देश दिले आहेत.


८ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले होते. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह देण्यात आले होते. अंधेरी पोटनिवडणूक पार पडल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावे, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र, दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाची ही याचिका फेटाळून लावली. पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह गोठवण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा असल्याचे म्हणत दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणी अंतिम निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत.



हे सुद्धा वाचा : SEA-VIGIL : सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचे “सी व्हिजील”

Comments
Add Comment

शैक्षणिक संस्था, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि क्रीडा संकुलात भटक्या कुत्र्यांना ‘नो एण्ट्री’

सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश नवी दिल्ली : शैक्षणिक संस्था, बस-रेल्वे

तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीचे 'एटीसी' कोलमडले! दिल्लीच्या एटीसी बिघाडाचा फटका मुंबईला!

नवी दिल्ली: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणी एअर ट्रॅफिक

PM Modi : बिहारला नको 'कट्टा सरकार'! पंतप्रधान मोदींचा महाआघाडीवर 'दुतोंडी, गुंड' म्हणत जोरदार हल्लाबोल

औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी औरंगाबाद येथील एका

Delhi Airport : ATC सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड; दिल्ली विमानतळावर उड्डाणांना विलंब; प्रवाशांना मनस्ताप

नवी दिल्ली : देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) गुरुवारी

४१६ वर्षांत ४१६ वेळाच उघडले कार्तिकेयाचे मंदिर

ग्वालियर : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर, राज्यातील एकमेव भगवान कार्तिकेय स्वामी मंदिराचे दरवाजे अखेर मंगळवारी

राजस्थानमध्ये लग्नसराईत २५ हजार कोटींची उलाढाल!

जीएसटी कौन्सिलने वस्तूंवरील कर कमी केल्याचा थेट परिणाम जयपूर : लग्न म्हटलं की संगीताचे सुस्वर, सजवलेला मंडप,