BMC : जलवाहिन्यांची गळती रोखण्यासाठी पालिका सरसावली

  92

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये अनेक भागांत जलवाहिन्यांच्या गळतीमुळे शेकडो लिटर पाणी वाया जाते. हे वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेकडून (BMC) प्रयत्न सुरू असून सध्या कुर्ला परिसरातील जलवाहिन्यांची गळती पालिकेने थांबवली आहे. गेल्या २२ महिन्यांत १०९२ ठिकाणी गळती झालेल्या जलवाहिन्या पालिकेने दुरुस्ती केल्या आहेत.


मुंबईतील अनेक दाटीवाटीच्या परिसरातून पालिकेच्या जलवाहिनी जातात. त्यापैकी एक परिसर म्हणजे कुर्ला. कुर्ला परिसरात जाणाऱ्या जलवाहिन्यांच्या बाजूला अनेक घरे देखील आहेत. या ठिकाणी असलेल्या परिसरातील जलवाहिन्यांची गळती होत असते. या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया, तर मोठ्या प्रमाणात पाणी चोरीलाही जाते. वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेने प्रयत्न केले असून गेल्या २२ महिन्यांत पालिकेने कुर्ला परिसरात १०९२ ठिकाणी जलवाहीन्यांची गळती दुरुस्ती केली आहे.


कंत्राटदाराकडून महापालिकेने २४ ऑगस्ट २०२० ते ३० जून २०२२ या कालावधीमध्ये जलवाहिन्यांच्या १०९२ गळत्या दूर केल्या आहेत. सिमेंट काँक्रिटीकरणामुळे तसेच पावसाळी गटारांमधून जाणाऱ्या २३ जलवाहिन्या हलवल्या आहेत. तर ४१ जुन्या जलवाहिन्यांची बदली केली आहे. दरम्यान त्याच कंत्राटदारला पालिकेने पुढील दोन वर्षांसाठी गळती दुरुस्ती व जलवाहिनी बदलीसाठी १३ कोटींहून अधिक रकमेचे कंत्राट दिले आहे.

Comments
Add Comment

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, ओबीसी नेत्यांसोबत आज घेणार महत्वपूर्ण निर्णय

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारचे

Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्यावर मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर खलबत! मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कडक आमरण उपोषणाला बसणार

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा लालबाग राजाच्या दर्शनाला : देशाच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना

मुंबई : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी मुंबईतल्या गणेश मंडळांना भेट दिली . मुख्यमंत्री देवेंद्र