केंद्र सरकारकडून विविध राज्यात तांदळाची मोठ्या प्रमाणावर खेरदी

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशातील विविध राज्यात तांदळाची मोठ्या प्रमाणावर खेरदी केली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ६.८ टक्के अधिक तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी देशात धान्याचा कोणत्याही प्रकार तुटवडा भासणार नसल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच तांदूळ महाग होणार नसल्याचेही सरकारनं सांगितलं आहे.


सध्या केंद्र सरकार विविध राज्यात तांदळाची खरेदी सुरु आहे. या परिस्थितीत खरेदीचे नवे आकडे समोर आले आहेत. हे आकडे देशवासीयांसाठीही आनंददायी आहेत. देशात गतवर्षीपेक्षा जास्त धानाची खरेदी झाली आहे. केंद्र सरकारनेही जनतेला अन्नधान्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे आश्वासन दिले आहे. केंद्र सरकारकडे असलेला बफर स्टॉक पुरेसा असून, आता कोणताही साठा करू नका असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.


देशातील विविध राज्यांमध्ये तांदळाची खरेदी केली जात आहे. जिल्हा स्तरावरून सर्व डेटा गोळा करून राजधानीला पाठवला जात आहे. आकडेवारीनुसार, पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडूमध्ये यावर्षी तांदळाच्या खरेदी वाढवली आहे. उत्तर प्रदेश हे अन्नधान्न्याच्या उत्पादनाचं प्रमुख केंद्र मानले जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी आहे.

Comments
Add Comment

कर्नाटकात लहान मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी

नवी दिल्ली: कर्नाटकात मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कर्नाटकचे

Sukhoi Su-30 MKI Crashes: Su-30MKI विमान अपघातात स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद

दिल्ली: आसामच्या दाट जंगलात बेपत्ता झालेल्या त्या 'सुखोई-३०' विमानाबाबतची भीती अखेर खरी ठरली आहे. तासनतास सुरू

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नींकडून पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि कार्यशैलीचे कौतुक केले

Iran Israel Conflict Affect In India: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचला, नेमकं काय झालं?

दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या

Iran Israel War : खामेनी यांच्या निधनावर भारताची श्रद्धांजली; परराष्ट्र सचिव यांनी दिली इराणी दूतावासाला भेट

भारत सरकारतर्फे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाला भेट देऊन इराणचे दिवंगत

Sukhoi Su-30 MKI Crashes: भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० लढाऊ विमान कोसळले; टेकऑफनंतर बेपत्ता, पायलटचे काय झाले?

मुंबई: भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सुखोई-३० लढाऊ विमानाबाबत नवीन बातमी समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी