रब्बी हंगामात गव्हाची विक्रमी लागवड

  97

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाची विक्रमी लागवड केल्याचे समोर आले आहे. कृषी मंत्रालयाने देशातील गव्हाच्या लागवडी संदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातून हे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गहू लागवडीच्या क्षेत्रात १० टक्क्यांची वाढ झाली आहे. एक ऑक्टोबरनंतर देशात साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. रब्बी हंगामातील प्रमुख नगदी पिकांमध्ये गव्हाचा समावेश होतो.


भारतात गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून अनेक देश आपल्याकडून गव्हाची आयात करतात. यावर्षी केंद्र सरकारने गव्हाचे उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने देशात यंदा मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड केली जात आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानेही गव्हाच्या पेरणीची आकडेवारी जाहीर केली आहे.


या अहवालात १ ऑक्टोबरपासून आतापर्यंत विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी एकूण साडेचार लाख हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी केल्याचे सांगण्यात आले आहे. रब्बी हंगाम २०२२च्या सुरुवातीपासून सुरू असलेल्या गव्हाच्या पेरणीखालील क्षेत्राने गेल्या वर्षीचा विक्रमही ओलांडला आहे. यंदा सुमारे १० टक्के अधिक गव्हाची पेरणी झाली आहे.


उत्तर भारतात गव्हाखालील क्षेत्र जास्त


उत्तर भारतात गव्हाखालील क्षेत्र जास्त आहे. तसेच पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून चांगले परिणाम समोर येत आहेत. या राज्यांमध्ये शेतकरी हवामानाचे निरीक्षण करूनच गव्हाची पेरणी करत आहेत. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत तुरळक ठिकाणी झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.


गव्हाच्या पेरणीसाठी जमिनीतील ओलावा ही चांगली गोष्ट आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. अनेक भागात गहू व इतर रब्बी पिकांची पेरणी वेळेत झाली आहे. भारतात गव्हाची फक्त एकदाच कापणी केली जाते. रब्बी हंगामाच्या मध्यभागी थंड तापमानापूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गव्हाची पेरणी केल्यानंतर, मार्च-एप्रिलमध्ये पीक काढणीसाठी तयार होते.

Comments
Add Comment

IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (IPS / Indian Police Services) १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला