अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरातमधील १३ जिल्ह्यांत १०० हून अधिक ठिकाणी एटीएसने छापेमारी केली आहे. या कारवाईत ६५ जणांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्रीपासून ही छापेमारी सुरू असल्याचे समजते.
अहमदाबाद, भरूच, सुरत, भावनगर आणि जामनगर येथे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. बनावट बिलांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याप्रकरणी ही छापेमारी केली आहे. मिठाई, रिअल इस्टेट आणि फायनान्सशी संबंधित अनेक गटांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. या छापेमारीमुळे रिअल इस्टेट व्यवसायात खळबळ उडाली आहे. यासोबतच फायनान्स ब्रोकर्समध्येही भीतीचे वातावरण आहे. एटीएसने केलेल्या छापेमारीत मोठी बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात एटीएसने जीएसटी विभागासोबत संयुक्त कारवाई केली आहे. आतापर्यंत सूरत, अहमदाबाद, जामनगर, भरूच आणि भावनगर या जिल्ह्यांमध्ये १५० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. करचोरी आणि पैशांच्या व्यवहारासाठी आंतरराष्ट्रीय मार्गांवर हे छापे टाकण्यात येत आहेत.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…