सीमेवरच्या सर्वात उंच भागात डिजिटल पेमेंटची व्यवस्था

डेहराडून (वृत्तसंस्था) : काही काळापूर्वी देशातले चहाचे शेवटचे दुकान ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाले होते. त्यानंतर आजूबाजूची अनेक दुकाने याच नावाने व्हायरल झाली; मात्र सीमाभागातली अशी ‘शेवटची’ दुकाने ‘सोशल मीडिया’वर चर्चेचा विषय ठरल्याचे अनेक वेळा दिसून आले. असंच एक खास चित्र अलिकडे समोर आले.


देशातल्या सर्वात उंचीवरच्या बद्रीनाथमध्ये मणिफद्रपुरी माना नावाच्या गावाजवळ हे दुकान आहे. दुकानात दिसणारी सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याच्या काउंटरवर ‘यूपीआय बारकोड’ ठेवलेला असतो. म्हणजेच दहा हजार फूट उंचीवरूनही तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकता. ‘डिजिटल इंडिया’चे हे उत्तम उदाहरण आहे.


एका यूजरने दहा हजार फूट उंचीवरील या दुकानाचे फोटो शेअर केले आहेत. चित्रात ‘सीमेवरील भारताचे शेवटचे चहाचे दुकान’ असे बोर्डवर लिहिले आहे आणि ‘यूपीआय बारकोड’ आणि दुकान मालक दिसत आहेत. छायाचित्रांमध्ये चहाच्या दुकानाच्या फलकावर ‘मनिफद्रपुरी मना, ब्यास गुफा श्री बद्रीनाथ’ असे लिहिले आहे. यानंतर हा फोटो उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही शेअर केला.


आपल्या ट्वीटमध्ये या दुकानाची छायाचित्रे शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते. हे चित्र भारताच्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टीमची व्याप्ती आणि प्रमाण दर्शवते. महिंद्रा यांचे हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर ट्विटर यूजर्स सतत प्रतिक्रिया देत आहेत.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच