मुंबई : (प्रतिनिधी) : ‘पोल्ट्री‘साठी प्रदूषण नियंत्रण मंडळासह सरकारची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. पाच हजारांहून अधिक पक्षी असलेले व्यावसायिक या अधिकार कक्षेत आणले गेले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियत्रंण मंडळातर्फे ‘पोल्ट्री‘ व्यवसायाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मार्गदर्शन तत्त्वे दिली आहेत. हरित लवादात गौरी माऊलीखी यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत पाच हजारांपेक्षा अधिक पक्षी असलेल्या प्रकल्पाला प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेण्याचे बंधनकारक करण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहेत.
तसेच कुक्कुटपालन प्रकल्प उभारताना लोकवस्तीपासून पाचशे मीटर लांब असावा. नदी-नाल्यापासून दूर असावा. राष्ट्रीय महामार्गापासून व मुख्य रस्त्यापासून शंभर मीटर दूर असावा, आदी अटी घातल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी १ जानेवारी २०२३ पासून केली जाईल.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…