पोल्ट्रीसाठी आता सरकारची परवानगी बंधनकारक

  75

मुंबई : (प्रतिनिधी) : ‘पोल्ट्री‘साठी प्रदूषण नियंत्रण मंडळासह सरकारची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. पाच हजारांहून अधिक पक्षी असलेले व्यावसायिक या अधिकार कक्षेत आणले गेले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.


केंद्रीय प्रदूषण नियत्रंण मंडळातर्फे ‘पोल्ट्री‘ व्यवसायाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मार्गदर्शन तत्त्वे दिली आहेत. हरित लवादात गौरी माऊलीखी यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत पाच हजारांपेक्षा अधिक पक्षी असलेल्या प्रकल्पाला प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेण्याचे बंधनकारक करण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहेत.


तसेच कुक्कुटपालन प्रकल्प उभारताना लोकवस्तीपासून पाचशे मीटर लांब असावा. नदी-नाल्यापासून दूर असावा. राष्ट्रीय महामार्गापासून व मुख्य रस्त्यापासून शंभर मीटर दूर असावा, आदी अटी घातल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी १ जानेवारी २०२३ पासून केली जाईल.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता