Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीभाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा विजय : आशिष शेलार

भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा विजय : आशिष शेलार

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला. लटके यांचा विजय भाजपमुळे झाला असून आम्ही निवडणूक लढवली असती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पराभव निश्चित असता असे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले.

ऋतुजा लटके यांचा ५ हजार ४७१ मताधिक्याने विजय झाला. भाजपने या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा केला होता. मात्र, ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले की, भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्वमध्ये विजय झाला. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप व इतर डझनभर पक्षांनी पाठिंबा देऊनही ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाला अधिक मतदान झालेच नसल्याचे सांगत भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता असे शेलार यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -