उपवास करणाऱ्या महिलांमध्ये नकारात्मक परिणाम

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजच्या काळात, अधूनमधून उपवास हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. अनेक डॉक्टर आपल्या रुग्णांना हा आहार नियम पाळण्याचा सल्ला देतात. हे अनेक लोकांसाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे; परंतु याचा महिलांच्या हार्मोन्सवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार समोर आले आहे.

अधूनमधून उपवास करणे म्हणजेच ‘आयएफ’ ही अशी डाएटिंगची पद्धत आहे, ज्यामध्ये २४ तासांचे दोन भाग केले जातात. या उपवासामुळे जेवणाच्या वेळेवर मर्यादा येतात. कोणीही आपल्या सोयीनुसार त्याचे पालन करू शकतो. ‘काय खावं’ याऐवजी ‘केव्हा’ खावे यावर लक्ष केंद्रित केले जाते. साधारणपणे लोक दररोज १२ ते १६ तास उपवास करतात.

अमेरिकेतल्या इलिनॉय विद्यापीठातले शास्त्रज्ञ लठ्ठपणाचा अभ्यास करत होते. या वेळी त्यांनी अधूनमधून उपवास करण्याबाबत महिलांमध्ये होणारे बदल जाणून घेतले. रजोनिवृत्तीपूर्वी आणि नंतरच्या टप्प्यातल्या महिलांचा अभ्यासात समावेश करण्यात आला. या सर्वजणी लठ्ठपणाला बळी पडल्या होत्या. त्यांना आठ आठवडे अधूनमधून उपवास करण्यास सांगितले होते. त्यानंतर रक्ताचा नमुना घेऊन हार्मोन्स तपासण्यात आले. परिणामांमध्ये आढळून आले की, ‘डीहायड्रोएपियान्ड्रोस्टेरॉन’ (डीएचईए) चे प्रमाण आरोग्यविषयक गुणवत्ता सुधारते. यासंदर्भातली घट १४ टक्क्यांपर्यंत नोंदवली गेली.

संशोधनात सहभागी असलेल्या क्रिस्टा वराडी म्हणाल्या की रजोनिवृत्तीनंतर ‘डीएचईए’ कमी होणे ही चिंतेची बाब आहे. वास्तविक, ‘डीएचईए’ हा इस्ट्रोजेनचा प्राथमिक घटक आहे, जो स्त्रियांमधला सर्वात महत्त्वाचा हार्मोन्स आहे. त्याचप्रमाणे रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण अचानक कमी होते. तथापि, अभ्यासात अशा महिलांमध्ये लैंगिक अडचणी किंवा त्वचेतले बदल दिसले नाहीत.

Recent Posts

CSK vs SRH, IPL 2025: धोनीच्या संघाची खराब कामगिरी सुरूच…हैदराबादचा ५ विकेट राखत विजय

चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…

4 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २६ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…

5 hours ago

नाले व कचरा सफाई ; केवळ कागदावरच नसावी

पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…

5 hours ago

मराठवाडा तहानलेलाच

मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…

5 hours ago

बंद घरे मोकळा श्वास घेऊ लागली

रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…

5 hours ago

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून आरोग्य सेवा

मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…

6 hours ago