ऑनलाईन मासेविक्रीचा कोळी बांधवांना फटका

मुंबई (वार्ताहर) : ऑनलाईन विक्रीमुळे अनेकांना रोजगार मिळत असला तरी मासे विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कोळी बांधवांना याचा फटका बसत आहे. दलाल, वाहतूक यांचाही या मासे विक्रेत्यांना अडथळा निर्माण होत असून अनेक महिलांनी तर मासे विक्री करणे सोडले आहे. त्यामुळे आमच्या या मूळच्या व्यवसायाकडे शासनाने लक्ष देऊन अडचणी दूर कराव्यात अशी मागणी कोळी महिला करत आहेत.


पूर्वी मासे विक्रेत्यांची संख्या मोठी होती. प्रत्येक मासळी बाजारात मासे विक्रीसाठी स्पर्धा असायची. मुंबईतल्या चाळींमध्ये डोक्यावर मासळीची पाटी घेऊन कोळी महिला आपला व्यवसाय करायच्या. परंतु अलिकडच्या काळात ही संख्या रोडावली आहे. लॉकडऊननंतर तर या कोळी बांधवांच्या व्यवसायावर खूपच परिणाम झाला आहे. सध्याचे जग ऑनलाईन आहे आणि या ऑनलाईनच्या दुनियेत या कोळी व्यवसायाला ग्रहण लागले असल्याचे कोळी बांधवांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेच्या मासळी बाजारात मासे विक्री करणाऱ्या कोळी महिल्यांची संख्या शंभरच्या जवळपास असायची. परंतु आज ही संख्या कमी कमी होत पन्नासच्या आसपास आली आहे. या कोळी बांधवाला ऑनलाईन मासे विक्री, दलाल व ट्रान्स पोर्टच्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे या कोळी बांधवांचे म्हणणे आहे.


पूर्वी लोक मासळी बाजारात जाऊन मासे खरेदी करत असत. पण आता या ऑनलाईन सुविधेमुळे बाजारातील मासे विक्री जास्त होत नाही. हल्ली ऑनलाईन मासे विकणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात आहेत. त्यांना ग्राहकही चांगला प्रतिसाद देत असल्यामुळे कोळी बांधवाच्या मूळ व्यवसायावर परिणाम होत आहे. आता एसी बसची संख्या वाढली असून त्यात मासे विक्री करणाऱ्या महिलांना घेतले जात नाही. त्यामुळे मासे विक्रीसाठी वाहतुकीच्या सुविधेचीही अडचण होत आहे. बसमध्ये वासाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी अनेकदा प्रवाशांकडून केल्या जातात, असे या कोळी महिला आवर्जून सांगतात.


ऑनलॉईन विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून अनेकजण मासे घेतात. परंतु ते मासे केमिकलमध्ये साठवलेले असतात. त्यामुळे ते अनेक दिवस राहतात. असे केमिकलमध्ये साठवलेले मासे आरोग्यासाठी धोकादायक असतात, हे लोकांना कळत नाही. आणि सर्रास खरेदी केली जाते. आम्ही ताजा माल आणतो. तो आरोग्यासाठी फायदेशीर असतो. मात्र असे असतानाही आमच्या व्यवसायावर गदा येते. अनेकदा सकाळच्या वेळी मासे खरेदी करताना दलालांचा त्रास सहन करावा लागतो. ते दलाल त्यांच्या वजन काट्यामध्ये गफलत करतात. त्यामुळे आमचा तोटा होतो. हे असेच सुरू राहिले, तर भविष्यात आमच्या कोळी भगिनी आणि बांधव यांची ओळख पुसून जाईल. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना जशी नुकसान भरपाई दिली जाते तशी आम्हालाही द्यावी. तसेच आमच्या वाहतूकीचा प्रश्नही सोडवावा. - नयना पाटील, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित