६१ दिवस ४५ कि.मी. धावत विशाख कृष्णस्वामीने रचला विक्रम

कल्याण (वार्ताहर) : डोंबिवलीकर विशाख कृष्णास्वामी याने गेल्या ६१ दिवसांपासून दररोज ४५ किलोमीटर धावून सोमवारी सकाळी विश्वविक्रमाला गवसणी घातली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी विशाखचे अभिनंदन केले आणि त्याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.


महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दोन मिनिटे सायरन वाजवून विशाखने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी ढोल, ताशा, बँड आणि टाळ्यांच्या कडकडाटात विशाख विशाख असा जल्लोष डोंबिवलीकर करत होते. या प्रसंगी विशाख कृष्णास्वामीची आई देखील स्टेजवर उपस्थित होती. या कौतुक सोहळ्यात विशाखने यापुढे देखील नियमितपणे ४५ किलोमीटर अंतर १०० दिवसांपर्यंत धावून आणखीही काही जागतिक विश्वविक्रम पूर्ण करण्याचा मनोदय उपस्थितांसमोर व्यक्त केला.


खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने विशाखचा कौतुक, अभिनंदनाचा सोहळा पार पाडण्यासाठी आकर्षक स्टेजची तसेच रंगीबेरंगी फुग्यांच्या अंतिम रेषा गेटची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी शेकडो लोक व क्रीडा क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सहभागी होऊन विशाखचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या.


विशेषतः रनर्स क्लॅन या संस्थेचे सदस्य, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली, संत सावळाराम क्रीडा संकुलातील सदस्य, कल्याण डोंबिवली स्पोर्ट्स टीचर युनियनचे पेंढारकर कॉलेजचे नाईक, क्रीडा संवर्धिनी, केरळा समाजमचे माजी अध्यक्ष प्रदीप नायर व सदस्य, सेंट जोसेफ शाळेचे बँड पथक, श्रीमंत ढोल ताशा पथक, क्रीडा संकुलात येणाऱ्या पोलीस भरती प्रशिक्षण घेणारे शेख व त्यांची सर्व प्रशिक्षणार्थी असे शेकडो डोंबिवलीकर या अभिमान सोहळ्यात उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी केले असून या प्रसंगी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि काँग्रेसचे पदाधिकारी संतोष केणे, माजी सभापती प्रदीप हाटे तसेच माजी नगरसेवक प्रकाश माने, बाळासाहेबांची शिवसेना युवा सेनेचे डोंबिवली शहर प्रमुख सागर जेधे, शहर पदाधिकारी दीपक भोसले, प्रथमेश खरात, कौस्तुभ फडके आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

एसी ऑफिस सोडून मातीच्या गोण्या उचलल्या!

मोखाडा गटविकास अधिकाऱ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान मोखाडा : सरकारी योजना केवळ कागदावर किंवा आदेशापुरत्या

तलावपाळीवर नववर्षाचे स्वागत गंगा आरतीने !

३१ डिसेंबरच्या रात्री कार्यक्रम; वाराणसीहून पंडितांना आमंत्रण ठाणे : ठाणे शहर येत्या नवीन वर्षाच्या

ठाण्यात भाजप-शिंदे गटात जागावाटपाच्या वाटाघाटी

भाजपची ५० जागांची मागणी ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप

अंबरनाथमध्ये २०८ बोगस मतदार !

भाजपचा शिवसेनेच्या शिंदे गटावर आरोप, पोलीस चौकशी सुरू अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान खळबळजनक

Mira-Bhayandar Leopard Attack : होणाऱ्या नवरीवर बिबट्याची झडप: चेहऱ्यावर गंभीर जखमा अन्…नेमकं काय घडलं त्या घरात? मीरा भाईंदर हादरलं!

मीरा भाईंदर : पुणे आणि नागपूरनंतर आता मुंबईलगतच्या मीरा भाईंदर शहरात बिबट्याच्या वावराने मोठी खळबळ उडाली आहे.

पुलाच्या कामामुळे कल्याणमध्ये वाहतूक मार्गात २० दिवस बदल , वालधुनी उड्डाणपुलावर काम सुरू

कल्याण : कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेला जोडणारा वालधुनी उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ