हार्बर, मध्य रेल्वेवर रेल नीरचा तुटवडा

  92

Articulate Storyline

मुंबई (वार्ताहर) : सणासुदीला सोडलेल्या अतिरिक्त गाड्या आणि उत्पादन निर्मितीत झालेल्या बिघाडामुळे रेल्वेतर्फे विक्री होणाऱ्या रेलनीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हार्बर आणि मध्य रेल्वेवरील कल्याण ते इगतपुरी दरम्यानच्या स्थानकांवर पुढील १८ दिवस प्रवाशांचे पाण्यासाठी हाल होणार आहेत. या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्यांनी सोबत पाणी बाळगावे अशी विनंती केली जात आहे.


दिवाळी सणानिमित्त सुट्ट्या असल्याने, सणासुदीच्या हंगामामुळे प्रवाशांनी जास्त संख्येने प्रवास केल्याने रेल्वेच्या रेलनीरमध्ये तुटवटा निर्माण झाला असल्याचे आयआरसीटीसीकडून रेल्वेला सांगण्यात आल्याचे समजते. प्रवासी संख्या वाढल्याने रेल नीरच्या मागणीत वाढ झाली. तसेच अंबरनाथ येथे उत्पादन निर्मितीत बिघाड झाल्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत रेलनीरचा पुरवठा थांबवला असल्याचे सांगण्यात आले. या वर्षी, मध्य रेल्वेने सणासुदीला अतिरिक्त गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे रेल नीरची विक्री वाढली.


आयआरसीटीसीने सांगितले की, मुंबई विभागाव्यतिरिक्त भुसावळ, मनमाड, नाशिकरोड, सोलापूर, दौंड आणि अहमदनगर या स्थानकांवरही १५ नोव्हेंबरपर्यंत रेल्वे नीरचा तुटवडा होणार आहे. रेल नीरचा विक्री मोठ्या प्रमाणात होते. सणासुदीच्या विशेष गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर वाढती गर्दी यामुळे रेल नीरची मागणीही वाढत आहे. मध्य रेल्वेने या कालावधीत पाणी पुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे आयआरसीसीटीकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता