राज्यातली पोलिस भरती पुढे ढकलली

  107

मुंबई : राज्य शासनाने २७ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या मेगा पोलीस भरती (Police Bharati 2022) प्रक्रियेला अचानक स्थगिती दिली आहे. कोविड महामारीनंतर बहुप्रतिक्षीत पोलीस भरती प्रक्रिया ३ नोव्हेंबरपासून करण्याचे आदेश होते. त्याबाबतचे परिपत्रक पोलीस महासंचालकांनी प्रसिद्ध केले होते. मात्र १४ हजार ९५६ जागांसाठी होणारी भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे. ४८ तासात राज्य शासनाने निर्णय फिरविल्याने भरतीची तयारी करणाऱ्या लाखो युवकांत नाराजीची लाट पसरली आहे.


फॉर्म भरण्याची प्रक्रिया ३ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच साधरणत: २७ दिवसांचे नियोजन होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासुन भरतीची तयारी करणाऱ्या युवा वर्गात मोठ्या मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. ऐन दिवाळीत राज्य शासनाने मेगा भरती जाहीर करुन युवा वर्गाची दिवाळी गोड केली होती. मात्र,आजच्या निर्णयाने भरतीची तयारी करणाऱ्या युवकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. सर्वांची दिवाळीच कडू झाली आहे.


२७ ऑक्टोंबर रोजी पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी १४ हजार १५६ पदे भरण्याबाबत परिपत्रक जाहिर केले होते. त्यानंतर अवघ्या ४८ तासात या भरतीला प्रशासकीय स्थगिती देण्यात येत आहे. जहिरात देण्याबाबतचा निर्णय यथावकाश कळविण्यात येणार असल्याचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनीच २९ ऑक्टोबरच्या परिपत्रकाद्वारे जाहिर केले आहे. बारामतीतील सह्याद्री करीअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी सांगितले की, २०१९ पासून कोरोनासह विविध कारणाने लांबलेली भरती प्रक्रिया शासनाने सर्वात मोठी भरती प्रक्रिया सुरू केल्यामुळे उमेदवारांमध्ये उत्साहचे वातावरण होते. मात्र, आजच्या स्थगितीच्या निर्णयाने भरतीची तयारी करणारे उमेदवारच नव्हे तर त्यांच्या पालकांना देखील धक्का बसला आहे.


भरती स्थगितीचे योग्य कारण देणे अपेक्षित असताना केवळ प्रशासकीय कारण दिले आहे. जाहीर केलेली भरती ४८ तासात रद्द करुन शासनाने एक प्रकारे चेष्टाच केल्याची सर्वांची भावना आहे. १२ लाखांपेक्षा जास्त मुले या भरतीची तयारी करीत आहेत. या सर्वांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता वाढली आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी