नोकरीची सुवर्णसंधी! दहावी उत्तीर्णांना ६९ हजारांपर्यंत पगार!

सीमा सुरक्षा दलात १०,४९७ जागांची भरती


मुंबई : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या एकूण २४ हजार ३६९ रिक्त जागा आहेत. या अंतर्गत सीमा सुरक्षा दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या एकूण १० हजार ४९७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे.


या पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. परीक्षेत सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, सामान्य ज्ञान आणि जागरुकता, प्राथमिक गणित आणि इंग्रजी/हिंदी या विषयातील ८० वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि एकूण १६० गुण असतील. परीक्षेसाठी एकूण ६० मिनिटांचा म्हणजेच एक तासाचा कालावधी दिला जाईल. ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये असेल.



अधिक संपूर्ण माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा....


अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in


अटी व नियम


पदाचे नाव – कॉन्स्टेबल (GD)


पदसंख्या – २४ हजार ३६९ जागा


शैक्षणिक पात्रता – १० वी पास


वयोमर्यादा – १८ ते २३ वर्ष


अर्ज शुल्क – १०० रुपये


अर्ज पद्धती – ऑनलाईन


अर्ज सुरू करण्याची तारीख – २७ ऑक्टोबर २०२२


अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२२


संगणक आधारित परीक्षेची तारीख – जानेवारी २०२३



एकूण पदे – २४ हजार ३६९


सीमा सुरक्षा दल ( बीएसएफ) – १० हजार ४९७ पदे
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल – १०० पदे
केंद्रीय राखीव पोलीस दल – ८ हजार ९११ पदे
सशस्त्र सीमा बल – १ हजार २८४ पदे
इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस – १ हजार ६१३
आसाम रायफल्स – १ हजार ६९७
सचिवालय सुरक्षा दल – १०३ पदे
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो – १६४ पदे
Comments
Add Comment

ईपीएफओचा मोठा निर्णय, पीएफ खात्यातून १००% रक्कम काढण्याची परवानगी

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सात कोटींहून अधिक सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओच्या

‘गलिच्छ शौचालयाची तक्रार करा आणि FASTag मध्ये ₹१,००० रिचार्ज मिळवा’

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने देशातील महामार्गांवर स्वच्छता आणि चांगली सुविधा सुनिश्चित

भारत ब्रह्मपुत्रा नदीवर तयार करणार जलसाठा प्रकल्प

चीनच्या ७७ अब्ज डॉलर्सच्या हायड्रो प्रकल्पाला देणार प्रत्युत्तर नवी दिल्ली : ब्रह्मपुत्र नदीवर चीनने सुरू

देशाची 'स्पेसटेक'मध्ये ऐतिहासिक झेप

भारताचा पहिला खासगी उपग्रह मिशन दृष्टी लवकरच प्रक्षेपित नवी दिल्ली :भारताची आघाडीची अवकाश-तंत्रज्ञान

आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव कुटुंबाच्या अडचणीत वाढ

न्यायालयाने आरोप केले निश्चित नवी दिल्ली :बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारी दरम्यान, आयआरसीटीसी घोटाळा

हे भाजपा सरकार आहे, जे बोलतो ते करतो - अमित शाह

जयपूर : “हे भाजप सरकार आहे, काँग्रेस सरकार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो”, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा